शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:32 IST

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ१० ते १५ टक्के द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्यावर्षी द्राक्षांचे उत्पादन वाढूनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे द्राक्षांना अपेक्षित भाव मिळाला नाही. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्णातून हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षबागायतदारांनी निर्यातीवर अधिक भर देत इंग्लंड, युरोप रशियासह अन्य देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली. त्यामुळे नंतरच्या काळात द्राक्षांच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्याचा फटक ा द्राक्षनिर्यातीला बसला नाही. बहुतांश मालाची निर्यात अंतिम टप्प्यात आली असताना आता देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले असून, मार्चअखेर द्राक्षांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना ६१ ते ८० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ३० रुपयांपासून ५०-५५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यात जसजसे बागांचे प्रमाण कमी होईल व तपमानात वाढ होईल त्याप्रमाणे वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दरही वाढतील, असा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.ओखी वादळाचा फटका व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे यावर्षी द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. शेतकºयांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. त्यामुळेच नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकºयांना शक्य झाले.- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ