शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:32 IST

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ१० ते १५ टक्के द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्यावर्षी द्राक्षांचे उत्पादन वाढूनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे द्राक्षांना अपेक्षित भाव मिळाला नाही. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्णातून हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षबागायतदारांनी निर्यातीवर अधिक भर देत इंग्लंड, युरोप रशियासह अन्य देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली. त्यामुळे नंतरच्या काळात द्राक्षांच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्याचा फटक ा द्राक्षनिर्यातीला बसला नाही. बहुतांश मालाची निर्यात अंतिम टप्प्यात आली असताना आता देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले असून, मार्चअखेर द्राक्षांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना ६१ ते ८० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ३० रुपयांपासून ५०-५५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यात जसजसे बागांचे प्रमाण कमी होईल व तपमानात वाढ होईल त्याप्रमाणे वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दरही वाढतील, असा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.ओखी वादळाचा फटका व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे यावर्षी द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. शेतकºयांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. त्यामुळेच नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकºयांना शक्य झाले.- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ