शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किल्ल्यांवरील खोदाईमुळे ऐतिहासिक वास्तूंची होतेय हानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 23:04 IST

त्र्यंबकेश्वर : शिवकालीन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे अशा मागणीचे साकडे गडकोट कार्य संस्थेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एका पत्रान्वये घातले आहे. सर्वाधिक डोंगरी गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या रामशेज, हरिहर, पिसोळगड, इंद्राई, हातगड, वाघेरा किल्ला, खैराई किल्ला, हरसूल या ठिकाणी उपद्रवी लोकांकडून होणाऱ्या खोदाईमुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा या ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : नुकसान थांबविण्याची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

त्र्यंबकेश्वर : शिवकालीन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे अशा मागणीचे साकडे गडकोट कार्य संस्थेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एका पत्रान्वये घातले आहे. सर्वाधिक डोंगरी गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या रामशेज, हरिहर, पिसोळगड, इंद्राई, हातगड, वाघेरा किल्ला, खैराई किल्ला, हरसूल या ठिकाणी उपद्रवी लोकांकडून होणाऱ्या खोदाईमुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा या ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.याबाबत वन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कुठेतरी शेवटच्या घटका मोजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे प्रकार थांबवावेत. तसेच किल्ल्यांच्या परिसरात होणारे खोदकाम, बांधकाम व खाणकाम कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा दरड पडण्याच्या घटना व किल्ल्यांना बसणारे हादरे यामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल. याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी वन, केंद्रीय, राज्य पुरातत्व, जिल्हा प्रशासन दुर्गसंवर्धन संस्थांची एकत्रित बैठक लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दळ यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.ऐतिहासिक ठेवा होतोय अस्पष्टनाशिकच्या गडकिल्ल्यांवर धनाच्या लालसेपोटी काही स्वार्थी, लोभी, उपद्रवी मंडळीकडून किल्ल्यांची अतोनात हेळसांड सुरू आहे. पिसोळगड (बागलाण) येथील ३ समाध्यांची पूर्ण नासधूस केली आहे. रामशेजवर नावालाच उरलेल्या सरदाराच्या वाड्याला सैनिकांच्या जोत्यांच्या मधोमध खोदून ठेवले आहे. तर इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरातील मूर्तीच गायब आहे. हातगडचा राणीवसा मधोमध खोल खोदून ठेवला आहे. हरिहर किल्ल्यावरील दगडी मूर्ती गायब आहेत. तर वाघेरा (त्रंबक) किल्ल्याच्या आजूबाजूला वनसंपदेला लाकूड माफियांचा हैदोस सुरू आहे.ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड थांबवादरवर्षी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वणवे लावून जैवविविधता, वन्य प्राणी, पक्षी नष्ट होत आहे याकडे ही वन विभागाने दुर्लक्षच केले आहे. नाशिकच्या गोदावरी पात्रात असलेल्या गोपिकाबाई पेशवे समाधी तसेच बलकवडे बंधू समाधी स्थळाची जोपासना व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी या विषयावर संबंधित विभागांना सूचना करून गडकोटांच्या भूमीतील ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड थांबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.आम्ही गेली १५ वर्षे नाशिकच्या भूमीतील गडकिल्ले, बारवा, पुरातन समाध्या, वीरगळ, यांच्या जतन संवर्धनासाठी जिवापाड राबतोय, समाज, सरकार, प्रशासन मात्र सातत्याने दुर्लक्ष करतोय आम्ही मोहिमे दरम्यान अभ्यासात्मक श्रमदान करतोय, मात्र जिल्ह्यातील असुरक्षित दुर्ग यांचे रक्षण करणे वन, पुरातत्व व जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. किल्ल्यांच्या परिसरात खाणकाम, खोदकाम, लाकूडतोड, वणवे यामुळे इथला निसर्ग इतिहास याला अतोनात बाधा होते. धानाच्या स्वार्थासाठी उपद्रवी किल्ल्यावरील वास्तूंची मोडतोड करतात हे दुर्दैव नाही तर काय? शिवरायांचे दुर्ग सांभाळणे, जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मग दुर्लक्ष का होतेय, हाच सवाल अम्ही करतोय.- राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक.

टॅग्स :FortगडGovernmentसरकार