शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’

By admin | Updated: April 13, 2015 01:48 IST

‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’

नाशिक : दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, कठीण प्रसंगांना तोंड देण्याची जिद्द असेल, तर यशाला गाठू शकतो, या विचारातून काम करीत राहिल्यानेच मेळघाटातील कुपोषणासारख्या समस्येची तीव्रता कमी करता आली, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष सातव यांनी केले. भारत ज्ञान विज्ञान समितीच्या वतीने महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे डॉ. सातव यांचे व्याख्यान झाले. डॉ. सातव हे वीस वर्षांपासून मेळघाटातील धारणी परिसरात कोरकू आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांनी ‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’ या विषयावर बोलताना आपल्या कार्याचा पट उलगडून दाखवला. ते म्हणाले, मेळघाट हा अद्यापही दुर्लक्षित भूभाग असून, तेथील आदिवासींमध्ये आजारांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. आपण चंद्र-मंगळावर पोहोचलो असलो, तरी आदिवासींना मात्र साध्या आजारांवर उपचार मिळत नाहीत. कुपोषणामुळे मुले मृत्युमुखी पडतात. मेळघाटात आजही ६० टक्के प्रसूती घरात होते. त्यामुळे तेथे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. स्वत:चा आनंद शोधण्यासाठी मेळघाटात एका झोपडीत काम सुरू केले. सुरुवातीला लोक येत नव्हते. त्यामुळे गावोगावी शिबिरे घेऊ लागलो. अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पत्नी डॉ. कविता ही डोळ्यांची सर्जन असल्याने तिची मदत झाल्याचे डॉ. सातव म्हणाले. वासंती सोर अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव हुदलीकर, प्रा. मिलिंद वाघ व कार्यकर्ते उपस्थित होते.