शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:43 IST

दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पाटोदा : दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कूपनलिका कोरड्यापडल्या तर बोअरवेल, हातपंप, कूपनलिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केले आहे. पशुपालकांना जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न पडला आहे. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासच्या वर गावे व तीस वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहेत. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरू न केल्यामुळे या भागातील नागरिकांना व मजुरांना काम नसल्यामुळे हे मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात तसेच राज्यात जात असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हातांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.दुष्काळाशी झगडत जगण्याची बेरीज मांडताना अस्मानी-सुलतानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसह मजुरांची जगण्याची लढाई अपयशी ठरत आहे. शासनाने या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळेल.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकºयांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी