शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:43 IST

दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पाटोदा : दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कूपनलिका कोरड्यापडल्या तर बोअरवेल, हातपंप, कूपनलिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केले आहे. पशुपालकांना जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न पडला आहे. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासच्या वर गावे व तीस वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहेत. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरू न केल्यामुळे या भागातील नागरिकांना व मजुरांना काम नसल्यामुळे हे मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात तसेच राज्यात जात असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हातांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.दुष्काळाशी झगडत जगण्याची बेरीज मांडताना अस्मानी-सुलतानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसह मजुरांची जगण्याची लढाई अपयशी ठरत आहे. शासनाने या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळेल.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकºयांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी