शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नाशिकमध्ये संततधार सुरूच, धरणं भरल्याने दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:43 PM

शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

नाशिक - शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पावसामुळे पिकांची चांगली वाढ होते. त्यामुळे नेहमीच दुष्काळाने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात होताच, श्रावणी सरी कोसळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही पावसाने चांगलाच मुक्काम केला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 90 टक्के तर गंगापूर धरण समूहात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सोमेश्वर जवळील दूध सागर धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे. शुक्रवारी पतेतीच्या सार्वजनिक सुट्टीचे औचित्य साधून पर्यटकांची गर्दी झाली होती. दारणा धरणातूनदेखील विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्येही पावसाने हाहाकार माजला असून नद्यांना महापूर आला आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत 167 जणांचा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण