शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:02 IST

नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.

ठळक मुद्दे उगवणीवर परिणाम : पेरणीचा खर्च गेला वाया; तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.जिल्ह्यात यावर्षी चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांची खरिपाची लगबग सुरू आहे. मागील वर्षी लष्करी अळीमुळे बेजार झालेल्या शेतकºयांनी यावर्षी मक्याऐवजी सोयाबीनला पसंती दिली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.वाहतुकीत हादरे बसले तरी नुकसान शक्यजिल्ह्याच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला वाफसा होण्यासाठी किमान ६० ते ७० मिलीमीटर पाऊस पडणे आवश्यक आहे. अनेक पेरणीची घाई करून थोड्या वापशावर पेरणी केली. त्यामुळे सोयाबीन उगवण क्षमतेवर परिणाम झाला. सोयाबीनचे बियाणे नाजूक असते त्याला वाहतुकीत थोडेफार हादरे बसले तरी त्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. अनेक शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. बियाणे अधिक खोल गेले तरी बी जमिनीतच सडते, असे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे उपसंचालक कैलास शिरसाट यांनी सांगितले. काही शेतकºयांच्या पेरण्या पूर्ण होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. ज्या शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली त्यातील काही शेतकºयांनी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही शेतकºयांचे बियाणे एकदमच पातळ उतरले आहे. यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे.अनेक शेतकरी जमिनीत ओलावा नसताना पेरणी करतात. त्याचा उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. सोयाबीनमध्ये हायब्रीड बियाणे नाही. घरचे बियाणे आणि कंपनीच्या बियाणांमध्ये फरक असतो. घरच्या बियाणाची उगवणक्षमता कमी असल्यास मात्रा वाढविणे गरजेचे असते.- प्रा. तुषार उगले,के. के. वाघ कृषी महाविद्यालयसोयाबीन बियाणाचे जर्मेनेशन परसेंटेज कमी असल्यामुळे ते कमी असल्यामुळे ते उगवत नाही. अनेक शेतकºयांनी यावर्षी घरचे बियाणे वापरले आहे. त्याची त्यांनी उगवणक्षमता तपासणे आवश्यक होते. काहींनी ती न तपासताच पेरणी केली. जिल्ह्यात सुरुवातीला पहिलाच मोठा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकºयांनी पेरणीस सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या दोन पावसामुळे बियाणे दाबले गेले. त्याचाही उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळीच पाऊस आला होता. त्यामुळे अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. ज्यांनी घरचे बी वापरले असेल त्याचाही परिणाम उगवण क्षमतेवर झाला आहे.- प्रकाश कदम, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सोयाबीन उताºयाची यावर्षी समस्या निर्माण होणारच आहे. कारण मागीलवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बियाणाची उगवण क्षमता खूपच कमी आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे २०० ते ३०० टन बियाणे पडून आहे. कारण त्याची उगवण क्षमताच खूप कमी आहे. त्यामुळे ते शेतकºयांनी दिलेच नाही. यावर्षी शेतकºयांनी शक्यतो घरचेच बियाणे वापरायला हवे. त्याचीही उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असल्यामुळे सोयाबीनला पोषक वातावरण आहे.- सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र, निफाड

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी