शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

लग्न सोहळ्यात अक्षता न टाकता धान्य केले दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:26 AM

लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला

नाशिक : लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला आणि अक्षतांसाठी वापरण्यात येणारे १०१ किलो तांदूळ गरिबांसाठी दान केले. हे तांदूळ वधू-वरांकडून लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेला दान करण्यात आले आणि अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.संजय सोनार मूळ राहणार लोणी प्रवरा येथील. त्यांच्या मुलाचा विवाह नाशिकमधील मोरे कुटुंबातील मुलीशी संपन्न झाला. मुलाच्या लग्नात एक नवीन प्रथा करण्याचे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी अक्षता पायदळी तुडवून वाया घालविण्याऐवजी गरिबांना दिल्यास त्याची मदत होईल, अशी कल्पना आली. याप्रसंगी क्लबचे रमेश चौटालिया, प्रवीण जैक्र ीश्निया, मनीष अहिरे, राजेश कोठावदे, सुनील देशपांडे, कोहोक, विनोद पाटील उपस्थित होते. माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी या प्रथेचा प्रसार लायन्सच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर करून त्याद्वारे विविध ठिकाणी धान्य बॅँक सुरू करण्यास मदत होईल.सांगितले.भुकेलेल्यांना अन्न मिळेलच, परंतु त्याचबरोबर उदरभरण करण्याचे महत् पुण्य लाभेल, या हेतूने अक्षता टाकण्याच्या परंपरेला छेद दिला व १०१ किलो तांदूळ भेट दिला. लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेच्या कार्यात त्यांचे नेहमीच सहकार्य असते. धान्य बँक हा उपक्र म चालवणारे सुजाता कोहोक, वैद्य नीलिमा जाधव, रितू चौधरी, अरु ण अमृतकर, मृणाल पाटील, यंदे, महेश सोमण यांनी आभार मानले. त्याचबरोबर अशाप्रकारचा उपक्रम सर्वांनी राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक