शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे.

त्र्यंबकेश्वर : निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे. आता सकाळी येणाºया   मेदवारालाही...आणि दुपारनंतर येणाºया उमेदवारालाही हो म्हणावे लागते. त्यातल्या त्यात त्र्यंबकेश्वरची तर बातच निराळी..... त्र्यंबकला पूर्वी पाचच वॉर्ड होते.  त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने ही स्पेशल केस नगरपालिका केवळ यात्रेकरुंना सोयी सुविधा देण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका स्थापन केली गेली आहे. आजही शहराची लोकसंख्या केवळ बारा हजार पाचशे एवढी असून, मतदार संख्या अवघी दहा हजारापर्यंत आहे. पूर्वी लोक भोळे होते. त्यांच्या हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता मतदार हुषार झाला आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो. काही मतदार तर बिलंदर असतात. त्यांना माहीत असते की पालिका प्रशासन कामे करणारच असते.  शासकीय योजनांचादेखील लाभ होणारच असतो. नगरसेवक एकदा निवडून गेला की, तो पाच वर्षे आपल्याकडे ढुंकून पहायलादेखील वेळ मिळत नसतो. त्यापेक्षा याला घ्या काढून असा सोयीचा विचार करून मतदार मतदानापूर्वी बेरजेचे राजकारण करूनच मतदान करतात. तर उमेदवारदेखील सत्ता मिळाली की, आपल्याच तोºयात राहतो. प्रभागात काम केलेच तर माझ्यामुळे झाले. त्यासाठी शिलालेख वगैरे लावण्याची घाई होते. मोठेपणा मिरविता येतो.  मतदार आपल्या समस्या रेटून सांगू शकत नाही. कारण तोच नगरसेवक म्हणू शकतो, मी कुठे तुमचे मत फुकट घेतले ? अशी शोकांतिका मतदारांची होत असते. आणि मतदाराने नाहीच म्हटले तर उमेदवारांना वाटते, म्हणजे आपल्याला मतदान होणार नाही. म्हणून उमेदवाराच आग्रह करतो, आमच्या समाधानासाठी तरी घ्याच. भेट समजा. नाही म्हणू नका. अशी पद्धत रूढ झाली आहे.  पूर्वीच्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत हाच फरक आहे. पूर्वी नगरसेवक कामे  करीत, म्हणूनच खरे काम  करणाºया उमेदवारालाच लोक मतदान करीत. आताच्या  जमान्यात प्रतिस्पर्धी उमेदवार  वाढले.स्पर्धा वाढली. निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी निवडणूक आयोग कार्यान्वित झाले. कायदे आणखी क्लिष्ट व कठोर करण्यात आले. हिशेब द्यावा लागतो. खर्च  मर्यादा आली.तथापि यातूनही पळवाटा काढून उमेदवाराला निवडून येण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले जाते.  काही ठिकाणी तर साम- दाम-दंड-भेद या नीतीचाही वापर करण्यात येतो. २०० ते २२० मतांचा वॉर्ड त्र्यंबक नगरपालिकेची स्थापना सन १८५४ साली अवघी दोन तीन हजार लोकसंख्या असताना तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली.  फ्लोटिंग पॉप्युलेशनवरील संख्या विचारात घेऊन पालिकेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला गावचा पाटीलच कारभार पाहत असे. पाटील (पोलीसपाटील) यांना समरी पॉवर असे. पोलीसपाटलांना दंड करण्याचादेखील अधिकार होता.कालांतराने लोकशाही पद्धत सुरू झाली. आणि निवडणुका होऊ लागल्या. २०० ते २२० मतांचा वॉर्ड असे. पूर्वीपासून ते साधारणपणे १९९० पर्यंत पक्षीय मतदान पद्धत नव्हती. व्यक्ती म्हणून मतदान होत असे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक