शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदा ९३ टक्के पाऊस

By admin | Updated: September 22, 2016 01:06 IST

गतवर्षीपेक्षा ३० टक्के अधिक : अतिवृष्टीचा इशारा

नाशिक : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्णात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचन, उद्योगाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, परतीच्या पाऊसही गेल्या तीन दिवसांपासून कमी, अधिक प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्णात यंदा उशिराने म्हणजेच जुलैच्या अखेरच्या टप्प्यात व आॅगस्टच्या प्रारंभी मान्सूनचे आगमन झाले, परंतु ते दमदार होते. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्णाला झोडपून काढले, एवढेच नव्हे तर नद्या, नाल्यांना पूर येऊन जीवित व वित्तहानीही सोसावी लागली; मात्र या पावसाने शेतकरी सुखावला, जिल्ह्णात ९० टक्क्याहून अधिक खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर जवळपास दीड महिना पावसाने दडी मारली. असे असले तरी, जिल्ह्णाची पावसाची वार्षिक सरासरी १६११७ मिलीमीटर इतकी असून, गेल्या वर्षी त्यापैकी ९७९८ मिलीमीटर इतकाच म्हणजेच एकूण सरासरीच्या ६० टक्के इतकाच पाऊस झाला होता. परिणामी खरीप हंगाम हातचा जाऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र आॅगस्टमध्येच धुवाधार पाऊस कोसळून सारी भरपाई काढून टाकली. वर्षाकाठी तालुक्यांमध्ये पडणाऱ्या पावसापेक्षा यंदा इगतपुरीत १४४ टक्के, दिंडोरी-१२१, बागलाण-११७, निफाड-१०३, सिन्नर-११७ टक्केपाऊस झाला आहे. आजवर १४९३६ मिलीमीटर पाऊस म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून लावलेल्या हजेरीमुळे पाण्याची वाट पाहणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले, त्याचबरोबर नदी, नाल्याच्या साठ्यात वाढ झाली, शिवाय विहिरींनाही त्याचा फायदा झाला आहे. अजून काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा व्यक्त होत असलेला अंदाज पाहता, रब्बी हंगामासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. (प्रतिनिधी)हवामान खात्याचा इशारापरतीच्या पावसाचे अनुकूल वातावरण सर्वत्र तयार झाल्याने हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. आगामी ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.