शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाड्याचे ‘गाजर’ दाखवून दिशाभूल !

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

मनमाड : जलहक्क संग्राम परिषदेचा अभ्यासदौरा...

मनमाड : निधीअभावी मांजरपाडा-१ प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून बंद असून, भविष्यात तीन वर्षांपर्यंत मांजरपाड्याच्या पाण्याचा एक थेंबही शेतकरी जनतेला मिळणार नसल्याचा अंदाज आहे, अशी परिस्थिती असताना निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाड्याच्या पाण्याचे गाजर दाखवून जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन नांदगाव व चांदवड तालुका जलहक्क संग्राम परिषद व मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वांत जास्त पाणीटंचाई होरपळ सोसणाऱ्या चांदवड तालुका (पूर्व) व मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी मांजरपाडा-१ योजनेचा प्रस्ताव असतानाही ते पाणी गोदावरी खोऱ्यात (येवला) वळवून नेले जात असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती पथकाने मांजरपाडा-१ योजनेचा अभ्यास दौरा केला. नारायणगाव शिवारपर्यंत (ता.चांदवड) जेमतेम कालव्याने पाणी येऊ शकलेले आहे. तेथून पुढे परसूलपर्यंत प्रकल्प निर्मितीपासून आजतागायत पाणी आलेले नाही. दरसवाडी व तेथून डोंगरगाव (ता. येवला) ८० कि.मी.पर्यंत कालव्याने पाणी यायला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या योजनेच्या पूर्णत्त्वासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. पथकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा परदेशी, राजकमल पांडे, संतोष बळीद, तुकाराम सोनवणे, आर.व्ही. पाटील, सलीम सोनावाला, संतोष बाकलीवाल, महेंद्रस्ािंह परदेशी, नीलेश वाघ, उपाली परदेशी आदि कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)