शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाचे अध्यक्ष अन् संमेलनाच्या कार्याध्यक्षांमधील मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

नाशिक : नाशिकला होणारे साहित्य संमेलन आता अवघ्या तीन आठवड्यांवर आले असताना कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला सरासरी ४००हून अधिक वाढत ...

नाशिक : नाशिकला होणारे साहित्य संमेलन आता अवघ्या तीन आठवड्यांवर आले असताना कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला सरासरी ४००हून अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत संमेलन व्हावे की होऊ नये, याबाबत चर्चेला बहर आला आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे संमेलन होणारच अशी वक्तव्ये करीत असतानाच येत्या दोन-तीन दिवसांत शासनाकडून काही मार्गदर्शन मिळेल, त्यानंतरच शासन, महामंडळ आणि आयोजक लोकहितवादी संस्था मिळून निर्णय घेऊ, असा सूर कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आळवला असल्याने संमेलनाच्या दोन प्रमुखांमधील मतभिन्नता समोर आली आहे.

कोराेनाच्या कालावधीत संमेलन घेण्याचे धाडस नाशिकच्या आयोजक संस्थेने दाखवले आहे. कोरोना असतानाच नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने संमेलनाचे आव्हान स्वीकारले असून, सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच संमेलन घेण्यात येणार असल्याचा दावा महामंडळ आणि लोकहितवादी मंडळाने प्रारंभापासूनच केला आहे. त्यासाठीची सर्व जय्यत तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच परिस्थिती निवळण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे तोपर्यंत परिस्थितीत फरक पडण्याची आशा असल्याचा महामंडळाच्या अध्यक्षांचा दावा आहे. तसेच स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री जरी बाधित असले तरी ते नाशिकमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने त्यांच्याशी चर्चा करूनच सारे काही होणार आहे. त्यामुळेच संमेलन होण्याबाबत संभ्रम निर्माण केला जाऊ नये. यंदाचे संमेलन निर्धारित २६ ते २८ मार्चदरम्यानच आयोजित करण्याचा आमचा इरादा कायम असल्याचा दावा ठाले पाटील यांनी केला आहे.

इन्फो...

साहित्य संमेलनाचे आयोजन हे शासन आदेशाच्या चौकटीतच केले जाते. त्यामुळे येत्या २-३ दिवसांत शासनाकडून काही अधिकृत दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन, साहित्य महामंडळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळाची स्वागत समिती मिळूनच त्याबाबतचा निर्णय घेऊ शकणार आहेत. शासनाकडून दिशानिर्देशाबाबत स्पष्टता आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

- हेमंत टकले, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन