शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

नव्या आरक्षणांसाठी टीडीआर देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:54 IST

नव्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने नियमावलीत इन्सेटीव्ह टीडीआरची आकर्षक घोषणा केली असताना महापालिकेने मात्र या योजनेवर पाणी फेरले आहे.

नाशिक : नव्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने नियमावलीत इन्सेटीव्ह टीडीआरची आकर्षक घोषणा केली असताना महापालिकेने मात्र या योजनेवर पाणी फेरले आहे. गेल्या दोन वर्षांत यासंदर्भात दाखल झालेल्या तीस प्रकरणांपैकी सात प्रकरणे आत्ता आरक्षित भूखंडांची गरजच नाही या कारणास्तव नाकारण्यात आली असून, त्यामुळे राज्य सरकारच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.  नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या पहिल्या म्हणजे १९९३ ते ९५ या कालावधीत मंजूर विकास आराखड्यात ५२७ आरक्षणे होती. आरखडा अंमलबजावणीच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्यातील अवघी ३० टक्केआरक्षणे जेमतेम महापालिका ताब्यात घेऊ शकली किंवा संबंधितांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर नव्या विकास आराखड्यात आकर्षक चटई क्षेत्र किंवा टीडीआरच्या पुढे जाऊन क्रेडिट बाँडच्या योजना सुचविण्यात आल्या होत्या. परंतु विकास आराखडा करताना त्यापेक्षा वेगळी योजना मांडण्यात आली त्यानुसार विकास आराखडा तयार झाल्यानंतर पहिल्या वर्षी आरक्षित भूखंड जागामालकाने परत दिल्यास त्यासाठी २० टक्के इन्सेटिव्ह टीडीआर देण्यात येणार आहे. पुढील दुसऱ्या वर्षी टीडीआर दिल्यास १५ टक्के, तिसºया वर्षी दहा टक्के तसेच चौथ्या आणि पाचव्या वर्षी पाच टक्के इन्सेटिव्ह टीडीआर देण्याची तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच गेल्यावर्षी हा आराखडा भागश: मंजूर झाल्यानंतर आरक्षित भूखंड महापालिकेला देऊन वीस टक्के अतिरिक्त इन्सेटिव्ह टीडीआरचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत तीस प्रकरणे दाखल झाली आहेत. म्हणजेच जागामालकांनी जागा देण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली असून, या सर्वांना इरादा पत्र देण्यात आले आहे. त्यातील अटीनुसार अतिक्रमणमुक्त मोकळा भूखंड ठेवणे, त्याला कुंपण घालणे तसेच सातबाºयावर नाव लावून घेणे, अशी पूर्तता करण्यात आली असून, त्यानंतर आता टीडीआर सर्टिफिकेट मिळावे यासाठी फाइली सादर करण्यात आल्या आहेत. मात्र आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही प्रकरणे नाकारण्यास सुरुवात केली आहे व सात फाइलींवर इरादा पत्र रद्द करण्याचा शेरा मारल्याने अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.महापालिकेने इरादा पत्र दिल्यानंतरच संबंधितांनी अटींची पूर्तता केली असून, आता हे इरादा पत्र अंतिम वेळी नाकारल्यास संबंधित मिळकतधारक न्यायालयात जातील अशी नगररचना विभागाच्या अधिकाºयांना भीती असल्याने त्याने शेरा बरहुकूब इरादा पत्र रद्द करण्याची कार्यवाही केली नाही आणि टीडीआरही दिला जात नाही, अशी स्थिती आहे.शहर विकास आराखड्यातील भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून ही सवलत दिली आहे, त्यानुसार आत्ता टीडीआर घेणे सोयीस्कर वाटते अशा विचारांनी संबंधित मिळकतधारक पुढे आले आहेत. परंतु नंतर पुन्हा महापालिकेला गरज वाटेल तेव्हा टीडीआरचे भाव पडले असेल तर जागामालक आर्थिक मोबदला मागतील तेव्हा पालिका काय करणार? हा प्रश्न आहे.घोटाळ्यामुळे आयुक्तांचा निर्णयमहापालिकेत टीडीआर दोनदा लाटण्याचा प्रकार मध्यंतरी आयुक्ततुकाराम मुंढे यांनी उघडकीस आणला होता. त्यातील काही प्रकरणे तपासताना त्यांना त्यात अनेक गंभीर प्रकरणे अडकली होती. त्यामुळे आयुक्तांनी टीडीआर प्रकरणे बाजूला ठेवल्याचे सांगितले जात असून, आता त्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहेआताच भूखंडाची काय गरजसंबंधित मिळकतधारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या सलग दहा एकर शेती क्षेत्रातून रस्ता जात असेल तर त्यातील दहा पैकीमध्येच एखाद्या शेतकºयाची जागा आहे आणि त्याने रस्त्यासाठी आपल्या एक एकर क्षेत्रातील जागा देऊ केली, तर आता एवढ्या मोठ्या दहा एकर भूखंडापैकी मधला एक चतकोर भाग घेऊन काय करू? असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका