शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव नेऊर : नैसर्गिक आपत्ती आल्यास शेती पिकासाठी केलेला खर्च पीक विम्यातून भरून निघेल या आशेतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव नेऊर : नैसर्गिक आपत्ती आल्यास शेती पिकासाठी केलेला खर्च पीक विम्यातून भरून निघेल या आशेतून शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढत असतो; पण पीक विमा काढूनही त्याचा मोबदला मिळत नसेल तर पीक विमा काढायचा कशासाठी, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्याने दरवर्षी हजारो शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवत आहेत. यावर्षी शासनाने दिलेल्या मुदतीत येवला तालुक्यात फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सन २०१९ ला २२ हजार शेतकऱ्यांनी तर २०२० ला १४ हजार पाच शेतकऱ्यांनी आणि २०२१ ला फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपासून परतीचा पाऊस पडून पिकाचे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना मिळाले होते; पण मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा काढलेला विमा नुकसान होऊनही मात्र मंजूर न नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. खरिपाच्या पेरणी करता शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने किंवा आपले दागिने गहाण ठेवून शेतात खरिपाची पेरणी करीत असतो व उरलेल्या पैशातून पिकाचा विमा भरत असतो. त्यातच कधी काळी पिके जोमात असताना पाऊस दांडी मारतो तर कधी हातातोंडाशी आलेला घास अति पावसाने हिरावून घेतला जातो. पिकाचा काढलेल्या विमा मंजूर होईल व झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्याला असते.

इन्फो...

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी संख्या

वर्ष शेतकरी संख्या

२०१९ २२०००

२०२० १४००५

२०२१ ५२४१

कोट...

मागील वर्षी चांगल्याप्रकारे पिके आल्यामुळे नुकसान कमी झाले व मोजक्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला. दरवर्षी पीक विमा काढला म्हणजे नुकसान भरपाई मिळतेच, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्यामुळे मागील वर्षी पिके चांगली आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमाकडे पाठ फिरवली. पूर्वी कृषी कार्यालयाशी विमा केंद्र संलग्न होते; परंतु आता स्वतंत्र विमा केंद्र कार्यालय झाल्याने त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना झालेले नुकसान कळवता येणार आहे.

- कारभारी नवले, कृषी अधिकारी येवला

फोयो - २७ जळगाव नेऊर १

270821\27nsk_30_27082021_13.jpg

पिकाचे झालेले नुकसान