शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

विंचूर दळवी परिसरात झेंडूचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:00 AM

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विंचूरदळवी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असल्याने फुलोऱ्यात आलेल्या बागांची गळकूज होत आहे. त्यामुळे औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. हीच बाब टमाटा पिकासाठीदेखील घातक ठरू शकते.टमाटा पिकाची पाने खराब होत असून, त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. त्यामुळे या भागातील टमाटा उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेषत: विंचूरदळवी परिसरात शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. ऐन दिवाळीच्या सणात फुलांना चांगली मागणी असते; परंतु पावसाने झेंडूची फुले सडण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातच बळीराजा संकटात सापडला आहे.रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी खरिपाची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. केवळ ऊस व भात पिकासाठी हा पाऊस पोषक आहे. त्यातही सोंगणीस आलेल्या भाताला हा पाऊस घातक ठरत आहे. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली आदींसह परिसरातील गावांमध्ये सोयाबीनच्या सोंगणीस सुरुवात झाली आहे.सोंगणी केलेला सोयाबीन पावसात भिजत आहे. मागील आठवड्यात या मालाला मिळत असलेला भाव कालपासून थोड्या प्रमाणात घसरला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसामुळे अनेक गावांमध्ये सोंगणीस आलेल्या बाजरीची कणसे भिजली आहेत. कांद्याची रोपेही पावसामुळे खराब झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीNashikनाशिक