शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

मक्यावर लष्करी आळीचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 8:34 PM

सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.सिन्नरच्या पूर्व भागात पारंपरिक पिकांसोबतच मका आणि सोयाबीन यासारख्या नगदी पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात वरुण राजाची कृपादृष्टी राहील असे संकेत मिळत आहेत . कारण एरवी जुलै अखेरीस वाट बघायला लावणारा मान्सून वेळेआधीच पुर्वभागात बरसला. त्यामुळे जूनच्या दुसºया आठवड्यात बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या होत्या . मका आणि सोयाबीनचे क्षेत्र पूर्व भागात तुलनेने अधिक आहे. यंदा सोयाबीन शेतकºयांना ठेंगा दाखवणार अशी परिस्थिती आहे. कारण उगवणक्षमता घटल्याने अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. हे होत असतानाच उगवून मका पिकावरील लष्करी अळी चे अस्तित्व दिसू लागल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लष्करी अळीच्या आक्रमणामुळे दोन वर्षांपूर्वी मका पीक भुईसपाट झाल्याचे विदारक चित्र शेतकºयांनी अनुभवले आहे. जनावर देखील मक्याच्या चाºयाला तोंड लावत नव्हते. त्यामुळे यंदा देखील या संकटाचा सामना करावा लागणार असे शेतकरी बोलून दाखवत आहे.--------------------मक्यावरील आळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आता रासायनिक औषधांची मात्रा वापरली जात आहे. खतांसोबतच महागड्या औषधांचा डोस मका पिकाला द्यावा लागणार असून त्यातून आर्थिक घडी विस्कटलेला शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.शासनस्तरावरून लष्करी आळी नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच आवश्यक औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे. आधीच लॉक डाऊन मुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेती पिकांना भाव नाही. अशा परिस्थितीत खरीप हंगामात खते आणि औषधांचा खर्च करायचा कसा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक