शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:53 PM

जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देकारवाई : पोलिसांकडून आठवडाभरात पुन्हा मोहीम

नाशिक : जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.शहर पोलिसांनी अंबड, आडगाव, मुंबई नाका, भद्रकाली व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत संशयितांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अंबडमधील प्रकाश बापू कांबळे (२७), प्रकाश देवराम खवळे (२८), संभाजी गजमल पाटील (४०), सुनील नागराज पाटील (४२) यांना मटालेनगरमध्ये असलेल्या जय मल्हार पान स्टॉलजवळ एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करताना अटक करून जामिनावर सोडून दिले, तर दुसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोद दिलीप पिठे (२५), रमेश मधुकर जाधव, रवींद्र नाना जाधव, संजय काळू पवार या ३८ वर्षीय तिघांसह राम किसन गांगुर्डे (३५) आदींना दुपारी सव्वातीन वाजता तपोवनातील बटुक हनुमान मंदिराजवळ एकत्रितपणे अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारका सर्कलसमोरील एनडीसीसी बँकेच्या समोर असलेल्या सर्व्हिसरोडवर झालेल्या कारवाईत करण सुरेश साळवे (१९), गोपी भिवा आचारी (२३) वकार साजिद शेख (२४) मेहुल विनोद आगले (२७), मोदीन अन्सार शेख (३६) यांना रात्री १० वाजताच्या सुमारास गोंधळ घालताना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल के ला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आसिफ बशीर मेमन (४२), अनिलसिंग नायक (२७), तेजस विजय गायकवाड (२३) नितीन तुकाराम नाठे (२२) व अक्षय विजय राठोड (१९) या संशयितांना भद्रकालीतील तलावडी येथे सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.भद्रकालीतील तलावडीतच दुसºया घटनेत रात्री पावणेनऊ वाजता ओमकार कृष्ण गायकवाड (२६), कमर अन्वर शेख (३२), सुशील सुधाकर यशवंते (३०), अजय गांधी बागमार (२१), राजिंद्र त्रिभुवन यादव (३६) व रंजित अशोक भिसे (५४) यांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग व पोलीस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हेगारांवर जरब बसणारबुधवारी दिवसभर केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलिसांची कारवाई निश्चिच फायदेशीर ठरेल, असे मत नाशिककरांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी