शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

CoronaVirus News : तिसरी लाट आली, तरी आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेवेळचे पगार देताना कुचराई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 16:06 IST

नाशिक : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सर्व विभागांचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी सातत्याने आघाडीवर होते. ...

नाशिक : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सर्व विभागांचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी सातत्याने आघाडीवर होते. स्थळ, वेळ आणि काळाचं भान विसरून तसेच त्याबदल्यात संबंधित डॉक्टर, संबंधित कंत्राटदार आपल्याला ओव्हरटाईम किंवा काही प्रमाणात तरी अतिरिक्त वेतन देईल, अशी त्यांची सामान्य अपेक्षा होती. मात्र, दुसरी लाट संपल्यानंतर एक-दोन महिन्यांतच त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना संबंधित यंत्रणांनी पगार, ओव्हरटाईमचे पैसे देताना अचानकपणे हात आखडता घेतला. संबंधित हंगामी कर्मचारी, कामगारांनी वारंवार फॉलोअप घेऊन झाला, आता तर तिसरी लाट आली तरी अद्यापही अनेक कर्मचारी त्यावेळी कपात केलेल्या किंवा अद्यापही न मिळालेल्या वेतनापासून वंचित राहिले आहेत.

दुसऱ्या लाटेवेळी दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली होती. आधीच कमी मनुष्यबळ असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण असताना त्यात कोरोनाच्या संकटामुळे भर पडत गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार १ हजार लोकसंख्येमागे १डॉक्टर आणि ३ नर्सेस असाव्यात पण महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातही हे प्रमाण त्यापेक्षा खूप कमी असल्यानेच कोरोनाच्या लाटांवेळी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची उणीव जाणवते. मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर भीतीपोटी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊनच कोरोनाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यांना त्या प्रमाणात परतावा मिळाला नाही.

उर्वरित पगार कधी मिळणार?

पहिल्या लाटेनंतरच्या काळात अनेक लहान हॉस्पिटल्सनी त्यांच्याकडील कोविडची आरोग्य सुविधा बंद केली. घटलेले उत्पन्न आणि पुढची शाश्वती नसल्याने या हॉस्पिटल्सने निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या लाटेवेळी हॉस्पिटल्स पुन्हा सुरू झाली तेव्हा मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. त्याचा परिणाम असा झाला की नर्सेस, वाॅर्डबॉय, लॅब तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात जास्त वेळ आणि अपूर्ण सुरक्षा उपकरणांशिवाय काम करावे लागले होते. मात्र, दुसरी लाट संपल्यावर अनेक कर्मचारी, कामगारांना त्याचा योग्य मोबदला मिळालाच नाही. त्यांनी अनेकदा फॉलोअप घेऊनही तो मिळाला नसल्याने तो कधी मिळणार, असाच त्यांचा सवाल आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक