शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कॉँग्रेसला २००९च्या निवडणुकीचा फॉर्म्युला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:37 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे.

ठळक मुद्देदोन अतिरिक्त जागांची मागणी राष्ट्रवादीला पेचात पकडणार

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे. नाशिक जिल्हा कॉँग्रेसने गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत जागावाटपात कॉँग्रेसला देण्यात येणाºया पाच जागांव्यतिरिक्त आणखी दोन जागा अतिरिक्त मिळाव्यात, असा आग्रह धरला आहे. राज्यात दोन्ही कॉँग्रेसमध्ये समसमान जागा लढविण्याचे ठरत असताना त्यात नाशिकच्या अतिरिक्त जागांच्या मागणीमुळे खोडा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीशी आघाडी न झाल्याने कॉँग्रेसने पंधराही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी मालेगाव व इगतपुरी या दोन जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आले. अन्य मतदारसंघात कॉँग्रेस तिसºया व चौथ्या क्रमांकावर राहिली. असाच प्रकार २००९च्या निवडणुकीत झाला होता. कॉँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी झाली असता, कॉँग्रेसला पाच जागा सोडण्यात आल्या होत्या; परंतु सिन्नर व इगतपुरी या दोन जागांवरच कॉँग्रेस विजयी होऊ शकली. अन्य तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच, प्रारंभीच्या काळात कॉँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी पक्षाने स्वबळावर लढावे, असा सूर लावला होता; परंतु राष्टÑवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केल्यानंतर स्थानिक पुढाºयांचे आवाज बंद झाले असले तरी, राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर त्यांनी दावा सांगून एकप्रकारे दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मध्यंतरी पक्षाच्या निवडणूक समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांची राजकीय परिस्थिती व इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असता, पंधरा जागांसाठी ४४ इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यात इगतपुरी व मालेगाव या दोन्ही विद्यमान आमदारांचाही समावेश होता. तथापि, काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदाराने शिवबंधन बांधल्यामुळे आता जिल्ह्यात कॉँग्रेसचा एकमेव आमदार शिल्लक राहिलाआहे. अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत पार्लमेंटरी बोर्डाच्या झालेल्या बैठकीत मालेगाव, चांदवड, इगतपुरी, नाशिक पूर्व व नाशिक मध्य या पाच मतदारसंघांची मागणी करतानाच बागलाण व दिंडोरी या दोन विधानसभा मतदारसंघांची वाढीव मागणी केली आहे.जिल्ह्यातील पंधरा जागांचे राष्ट्रवादीसोबत वाटप करताना कॉँग्रेसला निम्म्या म्हणजे सात ते आठ जागा मिळाव्यात, असा आग्रह कायम ठेवून मालेगाव बाह्ण या विधानसभा मतदारसंघाचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. पक्षाच्या नेत्यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघ पक्षाकडे ठेवल्यास तो लढविण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी दर्शविली आहे.आठवडाभरात निर्णयाची शक्यतायेत्या आठवडाभरात दोन्ही कॉँग्रेसची जागावाटपाविषयी बोलणी होणार असून, त्यात नाशिकच्या जागावाटपाबाबत निर्णय होईल; मात्र कॉँग्रेसने राष्टÑवादीच्या ताब्यातील दोन मतदारसंघांवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादी ते मान्य करेल काय? तसे झाल्यास राष्टÑवादीकडून कॉँग्रेसच्या ताब्यातील इगतपुरी व नाशिक मध्य मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस