शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

थंडीचा कहर; पंधरवड्यापासून नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नाशिक : पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी (दि.२९) या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक दिवस-रात्र अंगावर उबदार कपडे परिधान करून ठेवणे पसंत करत आहेत.यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामात नोंदविले गेले होते. मात्र चालू वर्षी डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षाची नोंद मागे पडली असून, ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून, निफाड तालुका गोठलाही आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमधील बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे चांगलेच धास्तावले आहे. शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वाºयाचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता.चार वर्षांत प्रथमच पारा ५ अंशांवरगेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच किमान तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे ५.१ ही नोंद या चार वर्षांतील नीचांकी ठरली. ६ जानेवारी २०१३ रोजी शहराचे किमान तापमान ४.४ तर ९ फेब्रुवारी २०१२ रोजी २.७ अंश, तर ७ जानेवारी २०११ रोजी ४.४ अंशांवर पारा घसरला होता. एकूणच २०१४ पासून सर्वाधिक थंडीचा कडाका यावर्षी जाणवत आहे.सर्दी-तापाचे रुग्ण वाढलेथंडीचा वाढता कडाका नागरिकांना असह्य होऊ लागला आहे. वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी-पडसे, थंडी-तापाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. थंड खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जास्त रसदार फळेदेखील आहारात खाऊ नये. पाणी उकळून प्यावे, अशा उपाययोजना शहरातील डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.शहराचे किमान तापमान असे (अंशात)दिनांक कमाल किमान२० डिसेंबर २७.१ ९.३२१ डिसेंबर २९.० ८.३२२ डिसेंबर ३०.१ ९.६२३ डिसेंबर ३०.० ११.२२४ डिसेंबर ३०.२ १२.३२५ डिसेंबर ३०.३ १४.३२६ डिसेंबर २६.६ १२.६२७ डिसेंबर २५.४ ५.७२८ डिसेंबर २३.९ ६.९२९ डिसेंबर २५.३ ५.१

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी