शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:07 IST

गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला

नाशिक : मागील दहा दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तपमानाचा पारा ७.९अंशापर्यंत खाली घसरला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ७.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशापर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळुहळु कमी होत चालली आहे. सोमवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला. मंगळवारी किमान तपमान ११.२ तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले होते. एकूणच कमाल तपमानाचा पारादेखील २५ अंशावरुन पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तपमान तीस अंशापर्यंत आले असून किमान तपमानदेखील १२अंशापर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी दुपारपासून ढगाळ हवामान शहरात दाटल्यामुळे कमाल तपमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीणभागदेखील गारठला होता. निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्ष बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वा-याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते; मात्र दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले होते. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्या तापमान वाढल्याने नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान