शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:07 IST

गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला

नाशिक : मागील दहा दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तपमानाचा पारा ७.९अंशापर्यंत खाली घसरला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ७.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशापर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळुहळु कमी होत चालली आहे. सोमवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला. मंगळवारी किमान तपमान ११.२ तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले होते. एकूणच कमाल तपमानाचा पारादेखील २५ अंशावरुन पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तपमान तीस अंशापर्यंत आले असून किमान तपमानदेखील १२अंशापर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी दुपारपासून ढगाळ हवामान शहरात दाटल्यामुळे कमाल तपमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीणभागदेखील गारठला होता. निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्ष बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वा-याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते; मात्र दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले होते. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्या तापमान वाढल्याने नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान