शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:07 IST

गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला

नाशिक : मागील दहा दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तपमानाचा पारा ७.९अंशापर्यंत खाली घसरला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ७.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशापर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळुहळु कमी होत चालली आहे. सोमवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला. मंगळवारी किमान तपमान ११.२ तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले होते. एकूणच कमाल तपमानाचा पारादेखील २५ अंशावरुन पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तपमान तीस अंशापर्यंत आले असून किमान तपमानदेखील १२अंशापर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी दुपारपासून ढगाळ हवामान शहरात दाटल्यामुळे कमाल तपमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीणभागदेखील गारठला होता. निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्ष बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वा-याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते; मात्र दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले होते. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्या तापमान वाढल्याने नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान