शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बंद उद्योगांकडे चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:08 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देथकबाकी वसुलीचे आव्हान : महापालिकेने आतापर्यंत केले १७ कोटी वसूल

गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची आतापर्यंत ४५ टक्के म्हणजेच जवळपास १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असली तरी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न विभागीय कार्यालयाकडून केला जात आहे. मात्र ३० ते ३५ बंद कारखान्यांकडे असलेली जवळपास ४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.सर्वसामान्य नागरिकांकडून महापालिकेची थकबाकी नियमित वसूल होत असते. मात्र बड्या लोकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने अशी थकबाकी वसुली करणे महत्त्वाचे असते. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी ठोस उपाययोजना आखून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड यांनी सर्व प्रथम प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.निरीक्षक आणि लिपिक यांना दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते म्हणून मिळकतींच्या दारावर थकबाकीची यादी चिकटवण्यात येत आहे. १४ हजार मिळकत धारकांना सूचना पत्र देण्यात आलेले आहेत. ४२ थकबाकीदारांकडे जवळपास २३ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्यावर जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. १२ हजार नळपट्टीधारकांना सूचना पत्र देण्यात आले असून, २५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. ७५ गाळेधारक थकबाकीदार असून थकबाकी भरली नाही तर गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर थेटे, बबन घाटोळ, रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावने आदींसह कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत.सतरा कोटींची वसुलीयावर्षी घरपट्टी पोटी ११ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यात मागील वषार्ची मोठी थकबाकी असल्याने ४५ टक्के वसुली झाली आहे, तर यावर्षीची ७२ टक्के वसुली झाली आहे. २६ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. पाणीपट्टी पोटी यावर्षी चार कोटी ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. १४ कोटी १७ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. विविधकरांची वसुली एक कोटी २२ लाख रुपये झाली आहे, तर २ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. एकूण सुमारे १७ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. विविध कारणांनी बंद असलेल्या ३० ते ३५ कारखान्यांकडे तब्बल चार कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. दरवर्षी या थकबाकीत वाढ होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर