शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

स्मार्ट सिटी की वाद सिटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 7:46 PM

नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी शाश्वत वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोक भावना जाणून कामे हवीवादविरहीत स्मार्ट सिटी साकारली तरी पुरे

संजय पाठक, नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

आठवी स्मार्ट सिटी परीषद नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. यावेळी जी शहरे स्मार्ट सिटी अंतर्गत मागे पडत आहेत. त्यांना वेगाने पुढे आणण्यासाठी भगीनी शहरांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. नाशिकची जोडी जम्मु आणि काश्मिरशी लावण्यात आली आहे. बैठकीत अनेक राज्यातील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तात्वीक मत प्रदर्शन केले असले तरी ते ढोबळ स्वरूपात होते. वास्तवात आणि तळात काय चालते हा आणखी संशोधनाचा विषय आहे. एखादा विदेशातील प्रकल्प एका स्मार्ट सिटीने राबवला तर त्याचे अंधानुकरण करताना त्या शहरातील सामाजिक आर्थिक स्थिती आणि विशेषत: मनस्थिती काय आहे,याची चाचपणीच केली जात नाही. त्यातही कंपनीला जगाचे भान अधिक आणि नागरीकांना, लोकप्रतिनिधींना कमी कळते असा दुराग्रह बाळगून कामे होत असतात. महापालिकांंना पर्यायी यंत्रणा असल्याने कंपन्या काय मनमानी करतात आणि लोकप्रतिनिधींचे हक्क डावलले गेल्याने काय होते याबाबत परिषदेच कोणतीही चर्चा झाली नाही. जो स्मार्ट लाईटचा प्रकल्प अद्याप पुर्णच झाला नाही त्याबद्दल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. त्यामुळे अशा परिषदांपेक्षा कोणत्या तरी निर्णयक्षम प्राधीकरणाने तटस्थपणे त्या त्या शहरातील लोकभावना जाणून घेण्यासाठी परीषद घेतली तर ते अधिक फलदायी ठरेल.

केंद्रात संयुक्त पुरागोमी आघाडी सरकार असताना नेहेरू नागरी अभियान राबविण्यात आले. परंतु त्यात झााले नाही तितके वाद आणि घोटाळे आता स्मार्ट सिटी अंतर्गत गाजत आहेत. स्मार्ट सिटी विरूध्द संचालक आणि कंपनीच्या विरोधात अन्य नगरसेवक, प्रकल्पाच्या विरोधात लाभार्थी असे एकेक वाढते विरोधक बघता ही स्मार्ट सिटी की वाद सिटी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये एकही प्रकल्प वादाविना सुरू झाला नाही की वादाविना संपला नाही. संचालक अंधारात आणि नगरसेवकांना पत्ता नाही. तेथे सामान्य नागरीकांची काय व्यथा? कंपनी स्थापन झाल्यापासून वादाचे ग्रहण लागले असून ते कायम आहे. नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी पट्टे मारून ते पे अ‍ॅँड पार्क सुरू होणार आहे आणि अचानक रस्ते खोदून तेथे स्मार्ट रोड सुरू होणार आहे. याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. अवघ्या एक किलो मीटर रस्त्यासाठी दोन वर्षे लागल्याने आता स्मार्ट सिटीचा प्रकल्प म्हंटला की नागरीकांना धडकीच भरते. अशा स्थितीत किमान वादविरहीत स्मार्ट सिटी साकारली गेली तरी पुरे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी