शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:36 IST

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

मनमाड : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. श्रमिक, मजूर व कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आयुष्य वेचणारा ‘आपला माणूस’ गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १३) होणार आहे.  नगर जिल्हातील खंडकरी शेतकºयांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. १९५७ ते १९६२च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, ना. ग. गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर होते. त्याच बरोबर डॉ. ए.बी. वर्धन, सुधाकर रेड्डी, डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून लाभले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. १९७४ ते १९८१ पर्यंत मनमाड शहराचे थेट नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. १९८४ मध्ये गायकवाड यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील असल्याने ती निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली होती. त्यावेळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होेते. या वृत्तामुळे कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत माधवराव गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. १९८५ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता. सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजयाची माळ गायकवाड यांच्या गळ्यात घातली होती. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या होत्या.अल्प परिचय...कॉ माधवराव गायकवाड यांचा जन्म १८ जुलै १९२४ रोजी मनमाड येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला.बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचे शिक्षण येथील छत्रे विद्यालयात झाले. परिसरात त्यांना बाबूजी म्हणून ओळखले जात.राज्यातील खंडकरी शेतकर्यांचे ते नेते होते . शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून शेतकºयांना न्याय मिळवून दिला.१९६० ते १९६२ पर्यंते ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर १९७४ साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक झाली.त्यात कॉ. गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. १९७४ ते १९८१ पर्यंत ते नगराध्यक्ष होते.१ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून निवड झाली. १९८५ साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू