शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

जानोरी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांसाठी बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 4:50 PM

शुभवर्तमान : जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सुविधा उपलब्ध

ठळक मुद्देखाजगी शाळेकडे कल वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत.

दिंडोरी : ग्रामीण भागात पक्के रस्ते आणि बससेवेअभावी आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी मैलोनमैल पायपीट करत शाळेत जाताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा आणि विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग घेत वस्तीपासून शाळेपर्यंत बससेवा सुरू करत एक वेगळा आदर्श घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बससेवा सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला आहे. खाजगी शाळेकडे कल वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचीही शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव आणि या शाळेकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला . त्यानुसार शिवाजीनगर पासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार व गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी भावसार यांनी जानोरी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे स्वागत केले. यातून नक्कीच मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होईल. ही सेवा निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा