शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची मदार आता शक्ती केंद्र प्रमुखांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:56 IST

कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

नाशिक : कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील हॉटेल राॅयल पॅलेसच्या सभागृहात ‘समर्थ बूथ अभियान’ उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भारतीय यांनी संघटनेचा पाया अधिकाधिक विस्तारण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यापुढील प्रत्येक निवडणूक ही आपल्याला स्वबळावर लढवायची असल्याने प्रत्येक जागेसाठी आणि प्रत्येक बुथसाठी आपले कार्यकर्ते सज्ज असणे आवश्यक आहे. पक्ष आहे, संघटन आहे म्हणून आपल्याला महत्त्व आहे. आपल्यामागे संघटना नसेल तर आपल्याला काहीच किंमत उरत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही भारतीय यांनी नमूद केले. यावेळी प्रदेश समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर, यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, सुमंत घैसास, अरविंद पाटील, सतीश निकम, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदींसह प्रदेश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

आता संघटन कार्य जोमाने करा

कोरोनाच्या प्रभाव काळात पक्षसंघटनेने जनतेच्या मदतकार्याला प्राधान्य दिले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर यांनी केले. प्रत्येक बुथमधील ३० जणांच्या समितीत युवा, महिला तसेच समाजातील सर्व जाती, धर्मांमधील घटकांचा त्यात समावेश करून सर्व बुथ समित्या अत्यंत सक्षम करण्याचे आवाहनदेखील आंबटकर यांनी केले.

 

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा