शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

By admin | Updated: February 28, 2017 00:40 IST

जिल्ह्यात सोमवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.

 नाशिक : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..एवढ्या जगात माय मानतो मराठी...मराठी भाषेचे वर्णन करावे तेवढे कमीच. जिल्ह्यात सोमवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, विद्यार्थ्यांची रॅली यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब गमे होते. यावेळी बोलताना प्रभाकर झळके यांनी ज्ञानेश्वर-तुकारामांपासून तर केशवसुत, गडकरी, कुसुमाग्रज, पाडगावकर आणि हल्लीच्या लिहिणाऱ्या अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केलेले असून, ते वाचल्याने आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध होत जाते. ज्ञान संपादनासोबतच मनोरंजनही मराठी साहित्यातून मोठ्या प्रमाणावर होते असे त्यांनी सांगितले. त्यांनी मराठी भाषेची ऐतिहासिक वाटचाल आणि विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत साहित्य, पंत साहित्य, शाहिरी साहित्य, आधुनिक मराठी साहित्य याचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी बोलीमधून येणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार, विविध शब्दांच्या उत्पत्ती व त्यातून निर्माण होणारे विनोद यांचे खुमासदार वर्णन केले. इंग्रजी शब्दांना मराठीत असणारे पारिभाषिक शब्द व त्याच्या वापरातून निर्माण होणारे विनोद यांचेही रसभरीत वर्णन त्यांनी केले.ओझरटाऊनशिप : येथील ओझर विकास संस्थेच्या विश्वसत्य कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रा. एस.ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा पगारे यांनी कुसुमाग्रजांविषयी माहिती सांगून कुसुमाग्रजांसारखा ध्रुवतारा बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी बघून ते प्रत्ययास आणण्याचे प्रयत्न करावे, नवनवीन साहित्याचे वाचन करून स्वत:तील साहित्यकाला समाजा समोर आणावे/ कविता, कथांचे लेखन करावे, असे आवाहन करून भाषा हे ज्ञान मांडण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. (लोकमत ब्युरो)