शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

९०० ग्रॅमची बालिका आता झाली ९ किलोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:41 IST

कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे बालिका सुदृढ झाली आहे.

ठळक मुद्देकुपोेषणावर मात : मायेचे छत्र हरपलेल्या बालिकेचा अंगणवाडीतच वाढदिवस

नाशिक : कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे बालिका सुदृढ झाली आहे.विंचूर (ता. निफाड) येथील कोमल गायकवाड असे या बालिकेचे नाव आहे. तिचा पहिला वाढदिवस गेल्या २२ रोजी अंगणवाडीतच धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोमल ही आठव्या महिन्यातच जन्माला आली त्यामुळे तिचे वजन अवघे ९०० ग्रॅम होते. आईची तब्येतही चिंताजनक असल्यामुळे आई खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर ४८ तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. कोमल अकरा दिवस जिल्हा रुग्णालयातच होती. या काळात आजी लीलाबाई गायकवाड, अंगणवाडीसेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली.कोमलच्या आईचा मृत्यूनंतर अंगणवाडीसेविका दररोज तिच्या घरी जाऊन प्रकृतीची काळजी घेत होत्या. अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही तिच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबाला मार्गदर्शन केले. कमी वजन असल्याने कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ. शुभांगी भारती यांनी यासाठी पुढाकार घेतला. पंधरा दिवस ठेवल्यानंतर तिचे वजन ४ किलो ७०० ग्रॅमपर्यंत वाढले. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमानमाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी देऊन तपासणी केली.सर्वांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने कोमल आज एकवर्षाची पूर्ण झाली असून, आज रोजी तिचे वय तब्बल ९ किलो ७०० ग्रॅम इतके झाले आहे. कोमलचा सांभाळ तिची आजी लीलाबाई गायकवाड या करीत असून, कोमलच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून सत्कारजिल्हा परिषदेच्या समन्वय सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यासाठी योगदान दिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी अशाच प्रकारे काम करून ग्रामीण भागाची सेवा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिकHealthआरोग्य