शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 2:02 AM

जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शून्य ते ३ इतकी कोरोना रुग्णांची संख्या असून यामध्ये आदिवासी तालुक्यांचा समावेश आहे. सुरगाणा, पेठ, कळवण या तालुक्यांमध्ये समाधानकारक परिस्थिती असून हे तालुके कोरोनामुक्त होत आहेत. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत ३५, ग्रामीण भागात ४०, मालेगाव मनपा क्षेत्रात केवळ २ तर जिल्हाबाह्यमध्ये ६ इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिलासादायक म्हणजे रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७८ इतकी आहे. चार मृत्यूंची नोंद रविवारी करण्यात आली. त्यामध्ये नाशिक ग्रामीणमधील तीन तर मनपा हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या