शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:05 PM

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता

ठळक मुद्दे२३७ टॅँकरने पाणी पुरवठा : जळगावला सर्वाधिक दाह

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून विहीरींनी तळ गाठण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत देखील आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, नाशिक विभागात ३० तालुक्यातील सुमारे सव्वा सहा लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ बसली असून, त्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाण्याची टंचाई जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली असून, त्यानंतर नाशिक व नगर जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने टॅँकरची संख्या वाढली आहे.गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. शासनाने जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीच्या पाण्याची पातळी उंचावल्याची आकडेवारी जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात काही ठराविक भागातच पाण्याची पातळी वाढली तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक विभागातील ५२ तालुक्यापैकी ३० तालुक्यांना यंदा जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणी टंचाई भासू लागल्याने अगोदर शासकीय टॅँकरने त्यांची तहान भागवावी लागली त्यानंतर खासगी टॅँकर सुरू करण्यात आले. विभागात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ जळगाव जिल्ह्याला बसली असून, धामणगाव, यावल, रावेर व चोपडा हे चार तालुके वगळता ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील १२६ गावांना १०२ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यातही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात सर्वाधिक ३४ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड हे तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यातील ९६ गावे १३५ वाड्यांना ६७ टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यातील २ गावांना २ टॅँकर तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर वगळता अन्य तीन तालुक्यातील १८ गावांना १५ टॅँकर सुरू आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक