शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

१७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By admin | Updated: September 9, 2015 23:41 IST

कार्यालयाला टाळा : आदिवासी प्रकल्प कार्यालयात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा ठिय्या

कळवण : कळवणच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहात १७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रवेश संख्या वाढवून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन करून अधिकारी र्गाला धारेवर धरले. यंत्रणेने समाधानकारक उत्तरे न दिल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचारी यांना तब्बल दोन तास कोंडून ठेवले.आंदोलनकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधा आणि आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, वसतिगृह व सुखसुविधांची कैफियत मांडा, असा आग्रह धरून न्याय द्या, अशी मागणी करीत जयश्री पवार यांनी प्रकल्प कार्यालयातच ठिय्या मांडल्यान कार्यालयातील अधिकारी यांची तारांबळ उडाली. तब्बल तासभरात प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली.विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशसंदर्भात प्रधान सचिव व वरिष्ठ यंत्रणेची बैठक सुरू असून, येत्या आठ दिवसांत सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आदिवासी आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त यांच्याकडून देण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रकल्प कार्यालयाच्या सहायक प्रकल्पधिकारी सौ. कर्पे, बागुल, महाले यांना निवेदन देण्यात आले.ठिय्या आंदोलन करून प्रश्न मार्गी लागणार नसल्याने आदिवासी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली कैफियत मांडली.शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहमधील समस्या बिकट असून, पहिले सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही, पोषण आहार मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व उपस्थित अधिकारी व यंत्रणा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. संतप्त कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या निषेधाच्या घोषणा देऊन कार्यालय दणाणून सोडले. यंत्रणेकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने कार्यालयाला टाळा ठोकून शासन व आदिवासी विकास विभागाचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय घेऊन प्रकल्प कार्यालयाला कुलूप लावले. व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तब्बल दोन तास कोंडून शासनाचा व आदिवासी कार्यालयाचा निषेध नोंदविला. येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले असले तरी प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आठ दिवसांत आंदोलन करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी यावेळी दिला.आंदोलनात पंचायत समितिीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, मधुकर जाधव, कैलास जाधव, प्रवीण रौंदळ, सागर खैरनार, जितेंद्र पगार, मनोहर बोरसे, संदीप वाघ, रमेश आहेर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)कळवण प्रकल्प कार्यालयअंतर्गत कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, बागलाण, मालेगाव व नांदगाव अशी सात तालुके येत असून, मुलांचे १७ व मुलींचे १२ असे २९ वसतिगृह आहेत. त्यात वसतिगृहांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रवेश मंजूर संख्या ३२००च्या जवळपास आहे. जवळपास १७०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे वसतिगृह वाढीव संख्या मंजुरीला आदिवासी विकास विभागाने मंजुरी द्यावी, भाडे तत्त्वावर इमारती घेऊन विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावावा, महिनाभरापासून फक्त उत्तरे देतात आठ दिवसांत निर्णय घेऊ, आता मात्र आठ दिवसात निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल.- जयश्री पवार,माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद