शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात कार्य समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. ...

तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याउलट आघाडीतील मंत्री ओबीसींची परिषद घेऊन दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपाच्या नंदुरबार जिल्हा प्रभारी खासदार रक्षा खडसे यांनी केली. तळोदा येथील आदिवासी विकास भवनात बुधवारी कार्य समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, नागेश पाडवी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होते.

राज्यातील आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच आता ओबीसी समाजाचेही आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे दोन्ही आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी पक्षाने येत्या २६ जून रोजी तीव्र आंदोलन छेडले आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर झटकून मोकले होत आहे. साहजिकच यामुळे समाजाचीही दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रवी अनासपुरे, खासदार डॉ. हीना गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कल्पना पांड्या, सुनील चव्हाण, कपिल चौधरी, डॉ. स्वप्नील बैसाने, दारासिंग वसावे, प्रवीण गिरासे, राजेंद्र गावीत, नीलाबेन मेहता, भारती कलाल, कैलास चौधरी, प्रकाश वळवी, नारायण ठाकरे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रदीप शेंडे, जगदीश परदेशी, हेमलाल मगरे, भैय्या चौधरी, गोकुळ पवार यांनी परिश्रम घेतले.

व्यासपीठावर बसण्यावरून रुसवे, फुगवे

प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी संयोजकांनी व्यासपीठ तयार केले होते. या व्यासपीठावर बसण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण झाली होती. आपल्याला जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून दोन पदाधिकारी यांनी तावातावाने कार्यक्रम सोडून बाहेर पडले होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना समजूत काढताना संयोजकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. शेवटी एकाची समजूत काढून त्यास व्यासपीठावर बसवून शांत केले. तर दुसरा कार्यक्रम सोडून माघारी परतलाच नाही. मात्र पदाधिकाऱ्यांच्या अशा रूसव्या, फुगव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा होती.