विकासाची आर्त हाक कधी प्रशासनाच्या कानी पडेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:43+5:302021-02-05T08:07:43+5:30

डेब्रामाळसह परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जवळपास १५० किलोमीटर अंतर पायी चढ-उतार करून मध्यवर्ती ठिकाण असलेले मोलगी गाठून अक्कलकुव्याला ...

Will the administration ever hear the call for development? | विकासाची आर्त हाक कधी प्रशासनाच्या कानी पडेल का?

विकासाची आर्त हाक कधी प्रशासनाच्या कानी पडेल का?

डेब्रामाळसह परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जवळपास १५० किलोमीटर अंतर पायी चढ-उतार करून मध्यवर्ती ठिकाण असलेले मोलगी गाठून अक्कलकुव्याला यावे लागते. हा प्रवास एका दिवसात करणे शक्यच नाही म्हणून विकास नावाची संकल्पना आणि विकास-विकास म्हणून दिंडोरा पिटणाऱ्या प्रशासनाने या भागातील विकास पाहिलाच पाहिजे. डेब्रामाळ ग्रामपंचायतीतील ही पाच गावं नंदुरबार जिल्ह्यातील टोकाची असून, या ठिकाणी विकास नावाची कोणतीही संकल्पना येथे दिसत नाही म्हणून या गावातील लोकांनाही वाटते की, आपल्या गावात एसटी बस आली पाहिजे. शाळा, अंगणवाडी, रेशनचे धान्य आपल्याला आपल्या गावातच मिळाले पाहिजे, आरोग्याच्या सोयी झाल्या पाहिजे. आपणही विकासाच्या कव्हरेज एरियात आले पाहिजे, अशी ही विकासाची आर्त हाक त्यांच्या मागण्यातून जाणवत होती. देशात विकासाच्या नावाने मोठा गाजावाजा करत मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात; पण वास्तवात तसे दुर्गम भागासाठी काहीच होत नाही. आजही स्थलांतर, पुनर्वसन, कुपोषण, आरोग्य या सारखे प्रश्न आजही ताजे आहेत.

या वेळी आंदोलकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी तीन किलोमीटर अंतर पायी चालत केली. रस्ता कामासाठी किती मटेरियल वापरले जाते हे दाखविण्यात आले.

या वळणावर असलेला भाग आणि खडीकरण मिनी बस येण्यास योग्य असेल अशा पद्धतीने करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्युतीकरणासाठी पाच दिवसात नवीन सर्व्हे करून वंचित गावांना लवकरात लवकर विद्युत पुरवठा करण्यासाठीचा पाठपुरावा करणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गावठाण, स्मशानभूमी व गुरचरण क्षेत्रासाठीची मोजणी प्रक्रिया लवकरच करणार असल्याचे आश्वासन ही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. १ मार्चपर्यंत सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याने बेमुदत आंदोलन व चूल बंद आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले. १ मार्चपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे आंदोलन प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या प्रति मुख्यमंत्री, खाजदार डॉ. हीना गावीत, आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी, बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकरी अधिकार, नंदुरबार, पोलीस निरीक्षक मोलगी पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहे.

या आंदोलनात पलासखोब्रा, वेलखेडी, सांबर, डेब्रामाळ येथील कार्यकर्ते आणि मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी व आपसिंग वसावे उपस्थित होते.

Web Title: Will the administration ever hear the call for development?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.