शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

श्रमदानातून ग्रामस्थांनी अडविले बंधा:याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:59 IST

ईश्वर पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवळीथ बंधा:यातून निघणारी मुख्य पाटचारीची भिंत फुटल्याने शेती ...

ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवळीथ बंधा:यातून निघणारी मुख्य पाटचारीची भिंत फुटल्याने शेती सिंचन व तलाव भरण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीवर विसंबून न राहता मोहिदे त.श. येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून वाहून जाणारे पाणी अडविण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.कवळीथ बंधा:यातून निघणारी पाटचारी लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, सोनवद, शिरुड दिगर, वरुळ कानडी, करजई या सुमारे दहा गावांची जीवनवाहिनी समजली जाते. कारण सोनवद येथील एक बंधारा, मोहिदा येथील सहा, सावळदा दोन, वरुळ कानडी एक,  करजई एक असे तब्बल 12 बंधारे या पाटचारीतील पाण्याने भरली जातात. पाटचारी प्रवाहीत राहत असल्याने कुपनलिका व विहिरींची पाण्याची पातळीही टिकून राहते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटतो. या पाण्याचा खरीप व रब्बी हंगामालाही मोठा फायदा होतो. गोमाई नदीवर मध्य प्रदेशात मालकातर परिसरात मोठे धरण बांधले गेले आहे. त्यामुळे ही नदी क्वचितच प्रवाहीत राहते. त्यात पाटचारी फुटल्याने वरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होईल ही शक्यता लक्षात घेता मोहिदे त.श. येथील माजी सरपंच जाधव संभू पाटील, भाऊभाई पाटील, शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक रमाकांत मंगेश पाटील, मोहिदे त.श. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन टी.बी. पटेल, सोनवदचे जयवंत पाटील, पुंडलिक भाऊसाहेब पाटील, उद्योजक शेतकरी किशोर नरोत्तम पाटील या ज्येष्ठ नागरिकांनी विचार-विनिमय करून गावातील युवकांना सोबत घेतले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली पाटचारीची भिंत एक हजार खताच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरून सुमारे पाटचारीची भिंत व दुस:या बाजूची सुमारे एक हजार फूट भिंतीची डागडूजी केली. तसेच मुख्य पाटचारीच्या मधोमध एक हजार फूट खडक पोकलॅण्ड मशिनच्या साह्याने फोडण्यात आला व दोन फूट उंचीचा गाळ जेसीबी मशिनच्या सहाय्याने काढण्यात आला. पाटचारीच्या मधोमध असलेला अजस्त्र खडकाचा अडथळा शासनाच्या पाटबंधारे विभागातील अधिका:यांच्या कधीच लक्षात आला नाही. तो अडथळा श्रमदानातून काढल्याने अवघ्या 36 तासात वरुळ-कानडीर्पयत पाणी पोहोचले. अन्यथा हे पाणी तेथर्पयत पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागायचे. या महाश्रमदानात माजी सरपंच जाधव संभू पाटील, भाऊभाई पाटील, रमाकांत मंगेश पाटील, टी.बी. पाटील, नरोत्तम पाटील, सोनवलचे जयवंत पाटील, पुंडलिक पाटील, कल्याण पाटील, राजेंद्र पाटील, डॉ.डायाभाई पाटील, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील, भगवान पाटील, सुभाष पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, रामकृष्ण पाटील, नितीन पाटील, रिंकू पाटील, मनीष पाटील, ऋषिकेश पाटील, धर्मा पाटील, प्रणय पाटील, चेतन पाटील, सोनू धनगर, कैलास पाटील, नेहल पटेल, दिनेश पाटील, डॉ.रितेश पाटील, डॉ.विवेक पाटील, नंदलाल फोटोग्राफर, दिनेश पाटील, उमाकांत पाटील, नंदलाल पाटील, प्रवीण पाटील, शरद पाटील, हिरालाल पाटील, गणेश पाटील, शांतीलाल पाटील, भूषण पाटील व  तरुणांनी सहभाग घेतला. पाटचा:यांची देखरेख करण्याचे काम पाटबंधारे विभागाचे आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या सुस्तावलेल्या व कामचुकार अधिकारी, कर्मचा:यांनी कवळीथ बंधा:यातून निघणा:या पाटचारीकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतातील  महत्त्वाची कामे सोडून मोहिदे त.श. येथील जागरूक नागरिकांनी श्रमदानातून मोठे काम केले. युवकांनीही या विधायक कामाला श्रमाची जोड दिल्याने परिसरात या विधायक कामाची एकच चर्चा होत आहे.