शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी ‘अपडेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन पूर्ण झाल्याची माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे़ यातही केवळ जिल्हा बँकेच्या सर्वच शेतकºयाच्या आधार अपडेशन झाले असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची नावे दर दिवशी जोडली जात असल्याने कर्जमुक्तीची प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत़१४ राष्ट्रीयकृत बँका आणि एक सहकारी बँकांनी २०१५ ते २०१९ या कालखंडात अल्पमुदत पीककर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले होते़ आठ जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता असल्याने पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी ९ जानेवारी रोजी प्रकाशित झाली होती़ यातही जिल्हा बँकेने १४ हजार शेतकºयांच्या याद्या देत बाजी मारली होती़ तर १४ राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार शेतकºयांचे आधार अपडेट नसल्याचे सांगत तशा याद्या बँकांबाहेर लावल्या होत्या़ परंतू यातून नेमके कर्जासाठी पात्र लाभार्थी किती याची माहिती समोर दिली नव्हती़ दरम्यान नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार सर्व १४ राष्ट्रीयकृत बँकांनी १७ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र स्पष्ट केले आहे़ परंतू बँकांच्या या आकडेवारीत येत्या ३१ जानेवारीपर्यंत बदल होणार असल्याने शेतकºयांची अंतिम आकडेवारी समजलेली नाही़ परिणामी राज्य शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड होण्यास विलंब होणार असून यामुळे पुढचा टप्पा लांबणार असल्याची चर्चा सुरु आहे़दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेत कर्जमुक्ती योजनेंसंंदर्भात शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले़ या कार्यशाळेमुळे योजनेला येत्या आठवड्यापासून गती येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयकृत बँकांकडून १७ हजार ५१ शेतकºयांनी २०१५ ते २०१९ या काळात कर्ज घेतल्याने त्यांच्या याद्या अंतीम करण्यात आल्या आहेत़ यातील १५ हजार ९९८ शेतकºयांचे आधार अपडेट असून १ हजार ७३ शेतकºयांच्या आधार अपडेशनची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती बँकांनी दिली आहे़ शेतकºयांच्या या याद्या तयार असल्याने त्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक असले तरी ३१ जानेवारीपर्यंत यात वाढ होणार असल्याचे सर्वच बँकानी सांगितले आहे़ बँकांच्या वरीष्ठ कार्यालयांकडून दरदिवशी शेतकºयांची नावे जोडण्याची प्रक्रिया होत असल्याची माहिती असून ३१ जानेवारी रोजी अंतिम आकडेवारी दिली जाईल असे सांगण्यात आले आहे़युनियन बँकेचे १ हजार ७३, देना बँक २५८, बँक आॅफ इंडिया ४३६, आयडीबीआय ३२९, बँक आॅफ बरोडा २ हजार ९२७, बँक आॅफ महाराष्ट्र २ हजार ९७२, कॅनरा बँक २९०, आयसीआयसीआय ४४, एचडीएफसी ३३, महाराष्ट्र ग्रामीण बँक २६७, अ‍ॅक्सीस बँक ३४, पंजाब नॅशनल बँक २४२, एसबीआय ४ हजार ४५६ तर सेंट्रल बँकेचे ३ हजार ५९० लाभार्थी शेतकरी तूर्तास कर्जमुक्तीला पात्र आहेत़जिल्हा बँकेचे एकूण १४ हजार ३१३ शेतकरी पात्र ठरणार असल्याचे अंतिम झाले आहे़ ३१ जानेवारीनंतर सर्व बँकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती अपलोड होणार आहे़ यानंतर शासनाकडून बँकांना कर्जमुक्त शेतकºयांच्या याद्या पाठवून कारवाईला प्रारंभ होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला महिन्याचा कालावधी लागणार असून मार्च महिन्यापासून शेतकºयांच्या कर्जमुक्तीला सुरुवात होणार आहे़