शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

तीन पक्षांच्या सरकारचा पहिला फटका आदिवासींना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:20 IST

राजरंग रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील आघाडी, युती, महाविकास आघाडी अशा विविध पक्षांच्या सरकारमुळे योजना आणि निधीबाबतही ...

राजरंग

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील आघाडी, युती, महाविकास आघाडी अशा विविध पक्षांच्या सरकारमुळे योजना आणि निधीबाबतही वेगवेगळ्या भूमिका असतात. गेल्या दोन दशकात अशाच स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकास कामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. सध्याच्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्षीय भूमिकेचा पहिला फटका आदिवासींना बसल्याचे चित्र आहे. याच सरकारमधील आदिवासी विकास मंत्री असलेले आणि जिल्ह्याचे नेते ॲड.के.सी. पाडवी यांनी कोरोना काळात आदिवासींना मदत मिळावी यासाठी महत्त्वाकांक्षी खावटी योजना आणली. त्याला सरकारने मान्यता देऊन तसा अध्यादेशही काढला. पण त्याला अशीच राजकीय नाट लागल्याने योजना रखडल्याचे बोलले जात आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे कामे बंद पडल्याने हातावर पोट घेऊन जगणाऱ्या आदिवासी कुटुंबांपुढे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना अन्नधान्य व रोजगाराची कुठलीही साधने नसल्याने  त्यांची अवस्था बिकट झाली होती. अशा स्थितीत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अर्थातच मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी खावटी कर्ज योजना पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला. ही योजना तशी १९७८ पासून यापूर्वीही सुरू होती. तथापि, २०१३ पासून ती बंद करण्यात आली. यापूर्वी या योजनेत ७० टक्के कर्ज व ३० टक्के अनुदान होते. परंतु मंत्री ॲड.पाडवी यांनी कोरोना काळात आदिवासींना खऱ्या अर्थाने मदत मिळावी यासाठी १०० टक्के अनुदानावर आधारित ही योजना तयार केली. त्याअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला चार हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची योजना आहे. त्यात ५० टक्के धान्य व ५० टक्के रोख रक्कम स्वरुपात आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ११ लाख ५५ हजार कुटुंबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कुटुंबांच्या प्रवर्गासंदर्भातही अधिकृतपणे ठरविण्यात आले. सर्व बारकाईने योजना तयार करून प्रशासकीय खर्च व इतर खर्च मिळून ४८६ कोटी रकमेची योजना तयार झाली. त्याला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळून त्याबाबतचा अध्यादेश ९ सप्टेंबर २०२० ला काढण्यात आला. अर्थातच ही संपूर्ण योजना तयार करण्यात मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचेच योगदान राहिले. योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीही त्यांची धडपड सुरू आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यासंदर्भातील निधी मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.खरे तर कोरोनाचा लाॅकडाऊन काळात आदिवासींची अवस्था खूपच जिकीरीची होती. मैलोन्‌मैल पायपीट करून बाहेर कामासाठी गेलेले मजूर घरी परतले. सुरुवातीच्या काळात सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांची मदत झाली. मात्र काही दिवसातच उपासमारीची वेळ सुरू झाली. शासनाच्या रोजगार हमी योजनेवर काही मजुरांना काम मिळाले पण काहींचा रोजगारासाठी शोध कायम राहिला. सर्वच कामे बंद असल्याने आदिवासींना रोजगार मिळणे कठीण झाले. नंदुरबार जिल्ह्याची स्थिती पाहता तीन महिन्यांपासूनच आदिवासींनी पुन्हा रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले. एरवी दिवाळीनंतर हे स्थलांतर होत होते. यावर्षी मात्र दोन महिने अगोदरच ते सुरू झाले. आतापर्यंत ४० हजारापेक्षा अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. अजूनही स्थलांतर सुरूच आहे. स्थलांतर करणारे कुटुंब हे खावटी कर्जाचे लाभार्थी होते. या कुटुंबांसाठी शासनाने योजना तर आणली पण त्यासाठी निधी न दिल्याने ही योजना आता अधांतरीत राहिली. गेल्या महिनाभरापासून त्याबाबतचे सर्वेक्षण सुरू असले तरी निधीची प्रतीक्षा मात्र कायम आहे. आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांना कोंडीत आणण्यासाठी हा राजकीय प्रकार सुरू असल्याचे सांगितले जाते. अर्थ विभागाने निधीबाबत अद्याप हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा आहे. तीन पक्षांच्या सरकारमुळे समन्वयाचा अभाव व निधी देण्याबाबत दुजाभाव होत असल्याचीही राजकीय गोटात चर्चा आहे. अर्थात अंतर्गत राजकारण किंवा प्रश्न काहीही असले तरी गरीब आदिवासी कुटुंबांना मदत देण्यासाठी शासनाने त्वरित निधी देऊन योजनेची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा आदिवासींच्या उत्थानाच्या कितीही गप्पा शासन करीत असले तरी त्यावर आदिवासींचाही विश्वास राहणार नाही.