शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रस्ता सुरक्षा अभियान काळातच वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हे कार्यक्रम फक्त फोटो सेशनसाठी होत असून रस्ता सुरक्षेसंदर्भात मात्र प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवताना दिसत आहेत. तसेच शहरातील बसस्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेक जण वाहतुकीचे नियम मोडताना दिसून येत आहेत.आरटीओ विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहावर ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात केलेल्या सर्वेक्षणात सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटनासाठी मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसून येतात. बसस्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता भर रस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे बसस्थानकातून बसेस बाहेर निघत असताना अनेकदा याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होतात. या परिसरात वाहतूक शाखेचे कर्मचारी असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील गांधी पुतळा परिसरात एकेरी वाहतूक मार्ग असूनदेखील वाहनधारक नियम मोडताना दिसून येतात. डायमंड बेकरीजवळ तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने याठिकाणी दिवसभर मोठ्या वाहनांची वर्दळ होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असूनही दिवसभर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने याकडे संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते.आरटीओ विभागाने एक दिवस शहरातील नवीन पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर काही नागरिकांना रस्ता सुरक्षासंदर्भात कार्यक्रम घेत कार्यक्रमाचे फोटोसेशन झाले. मात्र संबंधित विभाग येथूनच पुन्हा माघारी फिरले. तसेच रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे याविषयी जनजागृती होताना दिसत नाही. शासकीय कार्यक्रम म्हणून कार्यक्रम न करता या सप्ताहाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल अशाप्रकारे उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात याव्यात.रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वत:सह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊन लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल आणि यातून रस्ता सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान राबविण्यात येते. मात्र वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. तसेच खाजगी वाहतूक करणारे वाहनधारकही बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.