शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

By admin | Updated: April 9, 2017 13:02 IST

तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे.

 ऑनलाई लोकमत/मनोज शेलार  

नंदुरबार, दि.9- तंटामुक्तीत जिल्ह्याचा आलेख गेल्या तीन वर्षापासून खाली आला आहे. तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे. 
शासनाने गावांची सुधारणा आणि विकासासाठी  विविध योजनांची घोषणा दहा वर्षापूर्वी केली होती. त्यातीलच एक तंटामुक्ती गाव योजना. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटावे, गावातील एकोपा कायम राहावा, सामाजिक सलोखा टिकावा यासह इतर उद्देशाने 14 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. योजनेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तंटे गावातच सामोपचाराने मिटले. परिणामी न्यायालय आणि पोलिसांवरील ताण ब:याच प्रमाणात मिटला होता. पहिल्याच वर्षी राज्यात लाखोंच्या संख्येने तर जिल्ह्यात काही हजार तंटे निकाली निघाले होते. त्यामुळे दरवर्षी ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल अशी अपेक्षा असतांना मात्र, त्या योजनेकडे दुर्लक्षच झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 2007-08 नंतर उतरत्या क्रमाने गावे तंटामुक्त होत गेली. गेल्या तीन ते चार वर्षात प्रतिसाद अतिशय थंड आहे. पोलीस विभागाने देखील आपल्यावरील इतर ताण लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापासून तर एकही  गाव तंटामुक्त झालेले नाही. यंदा एकही प्रस्ताव जिल्ह्यातून नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतींच्या तुलनेत तंटामुक्त गावांची टक्केवारी 60 टक्केपेक्षा अधीक आहे हे विशेष.
स्पर्धा आणि चढाओढ
आठ वर्षापूर्वी या योजनेत सहभागी होण्यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा आणि चढाओढ निर्माण झाली होती. शासनाने ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या निकषानुसार बक्षीसांची रक्कम ठरविली आहे. त्यामुळे अनेक गावांना लाखांची बक्षीसे मिळाली आहेत. या बक्षीस रक्कमेतून गावांनी विविध उपक्रम देखील राबविले. त्याचा फायदा गाव विकासाला झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. परंतू नंतर या योजनेची व्याप्ती आणि निकाल घोषीत करण्यासाठीची गुंतागुंत पहाता पोलीस दलाने देखील नंतर काही प्रमाणात दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
उत्सवांना मर्यादा
याअंतर्गत सण, उत्सव साजरे करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. ब:याच गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली गेली. या संकल्पेनेला देखील योजनेअंतर्गत गुण होते. त्यामुळे अनेक गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या एकवर आली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. ती प्रथा आजही अनेक गावांनी कायम ठेवली आहे. त्याचा फायदा पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होण्यात तर झालाच शिवाय गावागावातील याअंतर्गत स्पर्धा आणि चढाओढ देखील कमी झाली आहे. परिणामी गावाअंतर्गत भांडणे आणि वाद कमी झाले आहेत.
तंटामुक्तीसारखी योजना दुरगामी परिणाम करणारी ठरली. परंतू काही वर्षातच आलेली उदासिनता तिचे महत्त्व कमी करून जात आहे.