शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

‘बीडीओ’ हे पद मोठं भारी पण़़ चारचाकीची करावी लागते उसनवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:02 PM

गुलाबसिंग गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : नंदुरबार जल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीचा कारभार पाहून तालुका प्रशासन सुरळीत ...

गुलाबसिंग गिरासे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : नंदुरबार जल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीचा कारभार पाहून तालुका प्रशासन सुरळीत ठेवणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना चारचाकी वाहनांअभावी कष्टाचे दिवस काढावे लागत आहेत़ शासकीय वाहनांचे हक्कदार असून जिल्ह्यातील सर्व सहा गटविकास अधिकाºयांना चारचाकी वाहनाची सोय नसल्याने त्यांना खाजगी किंवा पदाधिकाºयांच्या वाहनात तालुक्यात दौरे करावे लागत असल्याचे प्रकार सुरु आहेत़जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जिल्ह्यातील सहा पंचायत समितीत नियुक्त गटविकास अधिकाºयांना नवीन वाहन देण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता़ पूर्वीचे अधिकारी वापरत असलेल्या वाहनांना १० वर्षे पूर्ण होऊन त्यांचा ‘घसारा’ झाला होता़ ही वाहने दोन लाख ४० हजार किलोमीटरपेक्षा अधिक फिरल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी वापरत असलेली वाहने थांबवली होती़ यातून मग नंदुरबार, तळोदा, शहादा, धडगाव, अक्कलकुवा आणि नवापुर गटविकास अधिकाºयांची परवड सुरु झाली आहे़ वाहन नसल्याने स्वत:चे किंवा भाडोत्री अथवा पदाधिकाºयांचे वाहन घेत अधिकारी वेळ मारुन नेत असल्याचे सध्या सुरु आहे़ दरम्यान या अधिकाºयांसाठी नवीन वाहन घेण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रत्येकी सहा लाख रुपये मंजूर केल्याची माहिती आहे़ परंतू सहा लाखात कोणतेच नवीन वाहन भेटत नसल्याची माहिती आहे़ यातून मग वर्षभरापासून अधिकाºयांची परवड सुरु आहे़जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी वाहन खरेदीसाठी रक्कमेत वाढ करुन देण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे़ परंतू तिकडून ‘रिप्लाय’ आला नसल्याने गटविकास अधिकाºयांना वाहनाची ‘उसनवारी’ करावी लागत आहे़ जिल्ह्यातील दोन तहसीलदारही गेल्या दोन वर्षांपासून याच उसनवारीचे बळी ठरत असल्याचेही चित्र दिसून आले आहे़