शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पपई उत्पादकांची लूट न थांबल्यास स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच ...

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच अनुषंगाने पपई व्यापारी हे शहादा शहरात वास्तव्यास आहेत. शहादा तालुक्यातून पपई खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून एकतर्फी पद्धतीने ठरवले जातात. कारण त्याच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पपई पिकांचे रोप, औषध, रासायनिक खत घेण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना काही अ‍ॅडव्हास स्वरूपात रक्कम देतात व पपई उत्पादनाची मनमर्जी पद्धतीने खरेदी करतात. या सर्व मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाने नियम लागू केले आहेत; पण त्या सर्व नियमांची पायमल्ली करीत पपई व्यापारी बिनधास्त शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत, तसेच अनेक व्यापारी शेतकऱ्यांना जास्ती भावाचे किंवा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करून पळूनही जातात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळात अनेक वेळा वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन पपई व्यापाऱ्यांचे शासनमान्य कागदपत्र पूर्ण करून त्यांना परवाना दिला पाहिजे व ज्या व्यापाऱ्याकडे शासनमान्य परवाना असेल त्यालाच फक्त पपई खरेदी करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी. जिल्ह्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे काम होत आहे. कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, नियमावली नाही, कोणतीही कागदोपत्री शासन दरबारी नोंद नाही म्हणून कसे काम करायचे किंवा शेतकऱ्यांचा माल भरून पैसे न देता पळून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर बाजार समितीचे दरपत्रकानुसार खरेदी करण्याचे आवाहन करूनही परस्पर दर कमी करून पपई उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापारी करीत आहेत. व्यापार कोणीही कुठेही करू शकतो, त्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु आर्थिक व्यवहार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच झाले पाहिजेत. कारण हे परप्रांतीय व्यापारी आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा व्यवहार करीत आहेत; पण शासनाच्या तिजोरीत एकही रुपया जमा न करता कर चोरी करत आहेत. फळ खरेदी करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचे परवाने काढून त्यांची संपूर्ण माहिती द्यावी, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांचे पैसे काढून देण्यास मदत करावी व संबंधित व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करून शिक्षा करावी. पपई उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा करून २५ जानेवारीपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा २६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथू पाटील, कृष्णदास पाटील, वामन पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, ईश्वर चौधरी, महेंद्र पाटील, रत्नदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.