शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक लॅब नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:05 IST

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून अजून विविध उपाययोजनांचे नियोजन केले असून ते प्रमाण शुन्यावर आणण्याचे नियोजन आहे. - डॉ.राजेंद्र भारूड

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे नियोजन केले होते. त्याचा निश्चित परिणाम दिसत असला तरी अजूनही वाढते रुग्ण चिंताजनक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. खास करून जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी प्रयोगशाळा नव्हती, सध्या सुरू झाली असली तरी त्याची क्षमता कमी असून अजूनही धुळे व इतर तपासणी लॅबवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नवीन आधुनिक तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
सध्या कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत असल्याने त्यावर काय उपायोजना होत आहे.?
नंदुरबार जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी हे प्रमाण अजून कमी करून ते शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. जिल्ह्याकडे केवळ ३० आॅक्सीजन बेड आहेत. त्याची संख्या वाढवून ती ७५ पर्यंत होणार आहे. याशिवाय साखळी तोडण्यासाठी सर्व पातळीवर प्रयोग सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यासह सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात नंदुरबार पाठोपाठ शहाद्यात रुग्ण वाढत आहेत, तेथे काय नियोजन?
नंदुरबारनंतर शहाद्यात रुग्ण अधीक आहेत. त्यामुळे शहादा येथे देखील स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न असून लवकरच ते सुरू होईल. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होतील. याशिवाय शहाद्यात क्वॉरंटाईन सेंटरही वाढविले असून रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.


नंदुरबार येथे अत्याधुनिक प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली असून मशिनरीची आॅडर्र नोंदविली आहे. सिंगापूरहून ही मशिनरी येत आहे. ही लॅब साधारणत: १२०० स्वॅब तपासणी क्षमतेची असून उत्तर महाराष्टÑातील सर्वात मोठी व आधुनिक लॅब ठरणार आहे.


लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविण्याचा प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे रेशनचे वितरण चांगले झाले. नवीन किमान ३६ हजार लोकांना रेशन मिळाले व त्यासाठी १२ हजार नवीन रेशनकार्डही दिले. रोहयोच्या कामांवर जास्ततीत जास्त मजुरांना काम देण्याचा प्रयत्न झाला. ६५ हजारापेक्षा अधीक मजूर या योजनेच्या प्रवाहात आले. दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना केल्याने त्याची चांगले परिणाम दिसून आले आहेत.