शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकासमंत्र्यांचे सातपुडा प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : सातपुड्यातील भौतिक विकास म्हणजे एक आव्हानच. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती ही विकासासाठी प्रतिकूल असल्याने त्या भागात रस्ते ...

नंदुरबार : सातपुड्यातील भौतिक विकास म्हणजे एक आव्हानच. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती ही विकासासाठी प्रतिकूल असल्याने त्या भागात रस्ते व इतर मूलभूत सुविधा करणे म्हणजे जिकिरीची बाब. स्वातंत्र्यानंतर आजवरचा इतिहास पाहिल्यास काहीना काही मोठ्या घटना घडाव्या लागतात. त्याच वेळी एखादा मोठा विकास प्रकल्प मंजूर होतो. या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणारा धडगाव रस्ता असो, चाँदसैली घाटाचा रस्ता असो, तोरणमाळ ते सावऱ्या दिगरचा रस्ता असो प्रत्येक घटनेला कुठला ना कुठला संदर्भ आहे. नुकताच माेठ्या वाजागाजाने भूमिपूजन झालेल्या नकट्या देव ते असली रस्ताही स्वत: आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी प्रतिष्ठेचा केल्याने तो रस्ताही साकारत आहे.

सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम-अतिदुर्गम भागात आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर धडगाव हे तालुक्याचे ठिकाणदेखील मुख्य रस्त्याने जोडलेले नव्हते. स्व.ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना व जिल्ह्याचे नेते सुरूपसिंग नाईक हे मंत्री असताना त्यांनी धडगावला रस्ता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने या भागात आणून तेथील भौगोलिक परिस्थिती दाखविली होती. त्यावेळी शहादा-धडगाव रस्ता झाला. त्यानंतर सातपुड्यातील प्रमुख रस्ता म्हणजे जिल्हा मुख्यालय ते धडगावचे अंतर कमी करणारा चाँदसैली घाटाचा रस्तादेखील अशाच पद्धतीने झाला. सध्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी हे तेव्हा आमदार होते. त्यांनी ९० ते २००० या दशकात या रस्त्याचा पाठपुरावा करून तो प्रतिष्ठेचा केला. मात्र मध्ये निधी न मिळाल्याने काम रखडले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख हे धडगाव तालुक्यात घाटली व गौऱ्या येथील कुपोषणाच्या घटनेने पाहणीसाठी आले होते. त्या वेळी वेळात वेळ काढून के.सी. पाडवी यांनी आपल्या मतदार संघातील भाग असल्याने मुख्यमंत्र्यांजवळ वेळात वेळ काढून चाँदसैली घाटाचा रस्ता पाहणीच्या कार्यक्रमाचे आयत्या वेळी नियोजन केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी खास मुंबईहून बुलेटप्रूफ गाडी लाखभर खर्च करून मागविण्यात आली होती. या गाडीने जेव्हा चाँदसैली घाटाच्या रस्त्यावर मुख्यमंत्री गेले तेव्हा अवघ्या चार पाच किलोमीटरवरच मुख्यमंत्र्यांची ‘ती’ गाडी नादुरुस्त झाली. अवघड घाट व दगड-गोट्याच्या रस्त्यावर ही गाडी चालली नाही. शेवटी दुसऱ्या गाडीवर काही अंतर पर्यंत मुख्यमंत्र्यांना रस्ता दाखविला आणि त्यांनी त्याच वेळी त्या रस्त्यासाठी निधी दिला होता. तोरणमाळ ते सावऱ्या दिगर रस्त्याच्याही असाच इतिहास आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी खडकी येथील कुपोषणाच्या वेळी त्या भागातील परिस्थिती पाहून रस्ता मंजूर केला होता. अर्थात त्यानंतर सहा मुख्यमंत्री बदलल्यानंतरही रस्ता पूर्ण झाला नाही ही बाब वेगळी पण रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. आता नकट्या देव रस्तादेखील असाच प्रतिष्ठेचा ठरला आहे. असली हे विद्यमान आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचे गाव. विद्यार्थी दशेत के.सी. पाडवी यांनी या रस्त्यावरून शिक्षणासाठी तब्बल २८ किलोमीटरची पायपीट करीत होते. आता मंत्री झाल्यानंतर ज्या रस्त्यावरून आपण पायी जाऊन शिक्षण घेतले किमान तो रस्ता व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. आमदार असताना त्यांना ते शक्य झाले नाही पण मंत्री झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी हा रस्ता मंजूर केला असून, सुमारे १३ कोटी खर्चाचा हा रस्ता त्या भागातील अनेक आदिवासी पाडे व गावातील नागरिकांना सोयीचा ठरणार आहे. तळोदा, शहादा आणि धडगाव तालुक्यासाठी त्याचा फायदा होईल. के.सी. पाडवी यांनी आपल्या गावाचा पूलदेखील विधानसभेत असाच प्रतिष्ठेचा करून मंजूर केला होता. आमदार झाल्यानंतर पहिल्याचवेळी त्यांनी विधानसभेत असे भाषण केले की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभेतच त्यांच्या असली या गावाला पूल देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काही घटना, दुर्घटनांचा संदर्भ आणि काही नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे सातपुड्यातील विकास रडत-रखडत पुढे जात आहे हे मात्र निश्चित.