शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ही तर गरिबाची थट्टा; आदिवासी मुलींना आजही मिळतो फक्त १ रुपया भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:06 PM

आदिवासी भागात शाळेतील मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर भत्ता सुरू केला. पण..

नंदुरबार - आदिवासी क्षेत्रातील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना केवळ एक रुपया भत्ता देण्यात येत आहे. आदिवासी भागात शाळेतील मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर भत्ता सुरू केला. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील दारिद्र रेषेखालील मुली आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमातीतील मुलींना हा भत्ता देण्यात येतो. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून या सावित्रीच्या लेकींना दररोज केवळ 1 रुपया मिळत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

लोकप्रतिनिधी, प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वर्षानुवर्षे भरमसाट वाढ होते. मात्र, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने सुरु केलेल्या या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा साधा प्रयत्नही शासनाच्यावतीने करण्यात आला नाही. सन 1992 मध्ये तत्कालीन सरकारने प्रति विद्यार्थीनी 1 रुपये भत्ता सुरु केला होता. मात्र, महागाईने कळस गाठल्यानंतरही या मुलींना केवळ 1 रुपये भत्ता देण्यात येत आहे. या मिळणाऱ्या 1 रुपयांच्या भत्त्यातून साधी पेन किंवा पेन्सीलही विकत घेणे सध्याच्या काळात शक्य नाही. विशेष म्हणजे गतवर्षी या योजनेचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. तरिही, शासनाला या भत्त्यामध्ये वाढ करावी, असे वाटले नाही. दरम्यान, एकीकडे सरकार मुलींच्या शिक्षणासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. त्याच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, या आदिवासी भागातील मुलींकडे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सरकारला अजिबात वेळ नाही.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक