शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्त जिल्ह्याचा संकल्प स्वागतार्ह, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:00 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी कोविड तपासणी लॅबचा शुभारंभ करताना जिल्हा ...

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी कोविड तपासणी लॅबचा शुभारंभ करताना जिल्हा कुपोषणमुक्त करणार असल्याचा संकल्प केला. तसे पाहता ही घोषणा जिल्ह्यासाठी नवीन नाही. पण पालकमंत्र्यांच्या या घोषणेला महत्त्व आहे. ते यासाठी की त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद आहे. त्यांनी प्रयत्न केला तर निश्चितच जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे होऊ शकते. त्यामुळे त्यांचा या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. पण आजवरचा इतिहास पाहता आणि सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता त्यासाठी शासनाला आणि प्रशासनाला खूप महत्त्वाचे निर्णय, योजनांचे नियोजन आणि गांभीर्यपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.
नंदुरबार जिल्हा निर्मिती झाली तेव्हापासून आणि तत्पूर्वी दोन-तीन दशकांपासून जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेत आहे. जिल्ह्याचा नावापुढे हे एकप्रकारे विशेषण जोडले गेले आहे. हे विशेषण पुसून काढण्यासाठी गेल्या तीन-साडेतीन दशकात अनेक प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, स्व.विलासराव देशमुख हे सातपुड्यात येऊन गेले आणि कुपोषणमुक्तीसाठी अनेक घोषणा केल्या. काही चांगल्या योजना होत्या. पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्याने कुपोषण कायम राहिले. केवळ पैसा खर्च झाला.
कुपोषणाची बोंब कायम राहिल्याने मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने कागदावरच कुपोषण संपवण्याचा प्रयत्न केला. कुपोषित बालके आणि मृत्यूची नोंदच कागदावर न घेतल्याने बालमृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वात कमी करण्याची करामतही मध्यंतरी व्यवस्थेने केली होती. त्यासंदर्भात शंका उपस्थित होऊ लागल्याने नव्याने सर्वेक्षण करून मृत्यूची टक्केवारी पुन्हा वाढविण्याची वेळ प्रशासनावर आली होती. असे कित्येक किस्से जिल्ह्यातील जनतेने अनुभवले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा नव्याने कुपोषणमुक्त जिल्ह्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा खद्द आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी केल्याने ती खूप महत्त्वाची आहे. कारण अ‍ॅड.पाडवी हे स्वत: सातपुड्याच्या दुर्गम भागातील आहेत. आदिवासी संस्कृती आणि आदिवासींचे प्रश्न यांच्यावर त्यांचा वैयक्तिक मोठा अभ्यासही आहे. गेली तीन दशके ते स्वत: आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक नवीन योजना व उपक्रमांचा प्रस्ताव शासनाकडे दिलाही होता. विधीमंडळाच्या सभागृहातही आमदार असताना त्यांनी काही सूचना, काही प्रश्न मांडले होते. पण त्यावेळी त्यांना मर्यादा होती. आता स्वत: ते आदिवासी विकास खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या मनातील सर्वच संकल्पना व योजना साकारण्याची त्यांना संधी आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी मनावर घेतल्यास कुपोषणमुक्तीकडे जिल्ह्याला ते नेवू शकतील.
सध्याची स्थिती पाहता जिल्ह्यात कुपोषणाबाबत समाधानकारक चित्र नाही. लॉकडाऊन व कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा प्रश्न सध्या बाजूला पडल्याने त्यावर कुणी प्रकाशझोत टाकलेलाही नाही. पण वास्तव चित्र मात्र गंभीर होत असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणारे डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतील धान्य बालकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्यात यंदा व्यवस्था अपयशी ठरली. त्याबाबत तक्रारी सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यातील आहार काही भागात जून आणि जुलैमध्ये पोहोचला. याच काळात परिस्थितीमुळे अंगणवाडीतील बालकांचे योग्यवेळेस लसीकरण व आरोग्य तपासणीही झालेली नाही. अशा अनेक कारणांमुळे सॅम आणि मॅम बालकांची संख्या तीन ते चार पटीने वाढल्याचे चित्र आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था खूप काही चांगल्या स्थितीतील नाही. याशिवाय अजूनही अनेक पारंपरिक प्रश्न आहे तसेच आहेत. अशा स्थितीत कुपोषणमुक्त जिल्हा करणे म्हणजे एक आव्हानच आहे. हे आव्हान आदिवासी विकासमंत्री असलेले व जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे अ‍ॅड.के.सी. पाडवी व त्यांची टीम पेलणार अशी आशा करू या. त्यासाठी मात्र जिल्ह्यातील संघटना व जनतेचेही पाठबळ अपेक्षित आहे.