मिरचीची ‘लाली’ पसरली ७५ हजार क्विंटलच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:38 AM2020-02-17T11:38:00+5:302020-02-17T11:38:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिरची दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ परिणामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिरची दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ परिणामी नंदुरबार बाजारात मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढत असून रविवारअखेरीस येथे ७५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी पूर्ण झाली आहे़ बाजारात पसरलेल्या मिरचीच्या या लालीमुळे शेतकरी, व्यापारी आणि पूरक उद्योग यांना उभारी मिळाली आहे़
नंदुरबार बाजार समितीत गेल्या वर्षी तब्बल १ लाख ६२ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती़ नियमित आवकच्या तुलनेत ही मिरची कमीच असल्याने दरही बरेच कमी होती़ त्यातून वातावरण बदलामुळे मिरची खराब झाल्याने व्यापाऱ्यांनाही फटका बसला होता़ यंदा हंगामाची सुरुवात चांगल्या दरांनी झाल्याने मिरची उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते़ हे दर आतापर्यंत टिकून असल्याने उत्पादकांमध्ये उत्साह वाढला असून दर दिवशी ५ हजार क्विंटलच्या पुढे मिरची आवक होत असल्याची स्थिती बाजारात आहे़ यातून येत्या मार्च अखेरीपर्यंत हा हंगाम कायम राहणार असल्याने पूरक उद्योगही फुलणार असल्याचे व्यापारी आणि बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे़ दोन महिन्यात मिरची खरेदी विक्रीतून कोट्यावधी उलाढाल झाली़
नंदुरबार बाजारपेठेत यंदाही व्हीएनआर, लाली, शंकेश्वरी आदी ७५ क्विंटल मिरची खरेदी करण्यात आली आहे़ या मिरचीला व्यापारी २ हजार ६०० ते ४ हजार एवढे दर देत आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून हेच दर कायम असल्याने शेतकरी येथे मिरची विक्रीसाठी आणत आहेत़ विशेष बाब म्हणजे गुजरात राज्यातील निझर, वेलदा तसेच कुकरमुंडा परिसरात पिकवली जाणारी मिरचीही नंदुरबारमध्येच दाखल होत असल्याने शहरातील मिरची पथाºयांची लाली दिवसेंदिवस वाढत आहे़ एकीकडे ओल्या मिरचीला चार हजारापर्यंत भाव मिळत असताना दुसरीकडे कोरडी मिरची ६ ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दरांमध्ये खरेदी करण्यात येत आहे़ यातून शेतकरी कोरड्या मिरचीलाही बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत़ अनेक मिरची उत्पादक घरी मिरची वाळवून येत आणत आहेत़ बाजारातील या तेजीचा फायदा व्यापाºयांनाही होत असून परराज्यातील मिरची खरेदीदार दररोज शहरातील मिरची व्यापाºयांकडे संपर्क करुन मिरची खरेदी करुन रवाना होत असल्याचेही चित्र सध्या बाजारात आहे़