शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन, इंजेक्शन अन्‌ राजकारणाची ‘रि-ॲक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोना महामारीने सध्या साऱ्या जगाचे आरोग्य बिघडविले आहे. बिघडलेले आरोग्य सुधरविण्यासाठी डॉक्टर इंजेक्शनचा वापर करतात. अनेकांना ॲलर्जी ...

नंदुरबार : कोरोना महामारीने सध्या साऱ्या जगाचे आरोग्य बिघडविले आहे. बिघडलेले आरोग्य सुधरविण्यासाठी डॉक्टर इंजेक्शनचा वापर करतात. अनेकांना ॲलर्जी असल्यास इंजेक्शनची रि-ॲक्शन येते. ही रि-ॲक्शन थांबविण्यासाठी डॉक्टरांकडे औषध असते. मात्र, इंजेक्शनच्या प्रश्नावर राजकारणात उमटलेल्या रि-ॲक्शनवर सध्या कुणाकडेही औषध नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात दिसून येत आहे. रेमडेसिविरच्या प्रश्नावरून तब्बल महिनाभरापासून राजकीय रि-ॲक्शन सुरू झाली असून, ती थांबण्याऐवजी त्याचे साईड इफेक्ट सुरू झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या काही उपाययोजना राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेत आल्या आहेत. साहजिकच त्यामुळे नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे चांगल्या कामासाठी चर्चेत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात त्यांच्यावर काही लोकप्रतिनिधी आरोपही करीत आहेत. यासंदर्भात सर्वप्रथम खासदार डॉ. हीना गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांवर जाहीरपणे आरोप केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारीदेखील उपस्थित होते. अर्थातच या आरोपाला सर्वपक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. पण, काही दिवसांतच शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांचा समन्वयाचा अभाव उघड झाला. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या वादात पडून त्यांनी जाहीरपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कामांचे समर्थन व कौतुक करून खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर आरोप केले. या वादावर काही दिवस आरोप-प्रत्यारोप सुरू राहिला. या काळात मात्र सुरुवातीला खासदारांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मौन ठेवले. हे मौन अजूनही त्यांचे कायम आहे. जिल्हाधिकारी, खासदार डॉ. हीना गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता निवळण्याच्या मार्गावर असताना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी केल्याचा आरोप करीत माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यासोबत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही हा इशारा दिला आहे. त्याचबरोबर खासदार डॉ. हीना गावित यांच्या समर्थनार्थदेखील अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उभे ठाकले असून, त्यांनीही सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नव्हे तर काहींनी पोलिसांकडे निवेदनही दिले आहे.

मुळातच जिल्ह्यातील कोरोना महामारीने निर्माण झालेली समस्या ही जिल्ह्यातील खरी समस्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. सद्य:स्थितीत कोरोना नियंत्रणात येत असल्याने त्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी इतर उपाययोजना व लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. ग्रामीण व आदिवासी भागात याबाबत खूप गैरसमज आहेत. हा गैरसमज दूर करण्यासाठी यंत्रणा आणि काही कार्यकर्ते विविध माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. आरोग्य सेविकेचे ढोल वाजवून प्रबोधन असे की शिक्षकांचे भोलेशंकर, वासुदेवाचे सोंग घेऊन जनजागृती असो. होळी नृत्यातून गावोगावी होणारा जागर असो की जिल्हाधिकाऱ्यांचा बोलीभाषेतील ध्वनीफिती असो यातून थोड्या फार प्रमाणावर जागृती होत आहे. पण, संपूर्ण गावेच्या गावे जागर करायचे असेल तर नेते, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व गावपातळीवरील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. खासदार डॉ. हीना गावित यांचे बोलीभाषेतील प्रबोधन व चंद्रकांत रघुवंशी यांच्या आवाजातील ध्वनीफितीचे ध्वनिक्षेपकावरून जागृती वगळता राजकीय नेत्यांकडून लसीकरणाबाबत प्रभावी असे उपक्रम राबविले जात नसल्याचे चित्र आहे. मुळातच आवाहन करण्यापेक्षा नेत्यांनी गावपातळीच्या कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी करून सक्रिय केल्यास निश्चितच त्याचा चांगला परिणाम दिसणार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या लाटेत कार्यकर्त्यांचा वापर आंदोलन, मोर्चे काढण्यासाठी न करता लोकजागृतीसाठी करून कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.