शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्राधान्य कुटुंब योजनेत एक हजार कुटुंब वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शासनाच्या प्राधान्य कुटुंब योजनेत स्वस्त धान्य मिळण्यासाठी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील साधारण दीड हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शासनाच्या प्राधान्य कुटुंब योजनेत स्वस्त धान्य मिळण्यासाठी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील साधारण दीड हजार शिधापत्रिका धारकांनी येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडे प्रकरणे दाखल केली आहे. परंतु ग्रामीण भागातून केवळ 370 कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याने साहजिकच उर्वरित कुटुंबांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने वंचित कार्डधारकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तालुक्यासाठी उद्दिष्टय़ वाढवून देण्याची अपेक्षा शिधापत्रिकाधारक कुटुबांनी केली आहे.गेल्या चार वर्षापासून केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन दुकानदात मिळणारे धान्य शासनाने बंद केले होते. अर्थात सधन कुटुंबेही शासनाच्या रेशनचा फायदा घेत असल्यामुळे शासनाने हे धान्य बंद केल्याचे म्हटले जात होते. परंतु शासनाच्या या धोरणामुळे खरोखर गरीब असलेली कुटुंबेदेखील वंचित राहत होते. त्यामुळे शासनाने दोन वर्षापासून अशा केशरी शिधापत्रिकांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी प्राधान्य कुटुंब योजना सुरू केली आहे. तळोदा शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अशा केशरीकार्डधारक कुटुंबाकडून हमीपत्रे भरून घेण्यात आली आहेत. शहरी भागासाठी कुटुंबाचे उत्पन्न 65 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 42 हजार अशी उत्पन्नाची मर्यादा शासनाने निर्धारित केली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडे ग्रामीण भागातून साधारण एक हजार 540 हमीपत्रे दाखल करण्यात आली आहेत. जिल्हा पुरवठा अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा शाखेने हमी पत्रांची नियमानुसार कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. तथापि पुरवठा विभागाने या योजनेसाठी ग्रामीण भागास केवळ 370 कुटुंबांनाच समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे दाखल केलेल्या हमीपत्रांपैकी 75 टक्के कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. वास्तविक शहर व ग्रामीण भाग मिळून साधारण साडेपाच हजार कुटुंबे केशरी शिधा पत्रिकाधारक आहेत. त्यापैकी तीन हजार शिधापत्रिकाधारक ग्रामीण भागात आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शिधापत्रिकाधारकांची संख्या असतांना ग्रामीण भागास एवढय़ा  कमी उद्दिष्ट दिल्याने संबधीत यंत्रणेच्या नियोजनाबाबत ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या उत्पन्नाची मर्यादा व इतर कागदपत्रांच्या निकषानुसारच शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र दुकानदाराकडे दाखल केल्याचे लाभार्थ्ीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या योजनेत समावेश होणार नाही, असे लाभार्थी व दुकानदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद उद्भ्वण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधीत यंत्रणेने               याप्रकरणी दखल घेऊन निदान दिलेल्या उद्दिष्टय़ात वाढ करून              द्यावी, अशी मागणी केशरी कार्ड धारकांनी केली आहे. तळोदा शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्या साधारण दोन हजार 474 असतांना संबंधीत पुरवठा शाखेकडे निम्या संख्येनेदेखील हमीपत्रे दाखल झालेले नाही. केवळ एक हजार हमी पत्रे दाखल झाल्याचे पुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते. वास्तविक ग्रामीण भागापेक्षा पुरवठा विभागाने प्राधान्य धान्य योजनेत तळोदा शहराला अधिक उद्दिष्ट दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साधारण साडेतीन हजार कुटुंबांना समावेश करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या कार्डधारकांची एकूण संख्या लक्षात घेता शहरात अडीच हजारच शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या भोंगळ कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळोदा शहरात प्राधान्य कुटुंब योजनेबाबत पुरेशी माहिती मिळाली नसल्याने कार्डधारकांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. तळोदा शहराला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसले तर हे उद्दिष्ट ग्रामीण भागात वाढवून द्यावे, अशी अपेक्षा शिधापत्रिका धारकांनी व्यक्त केली आहे.