शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत-देशात नंदुरबारला टॉप टेनमध्ये आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:20 IST

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत देशात आघाडी स्वच्छ शहर सुंदर शहराचा सकल्पच पालिकेने केला आहे. दुर्देवाने एका गुणासाठी देशात टॉपटेनच्या यादीत येऊ शकलो नाही याची खंत आहे -रत्ना रघुवंशी

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत नंदुरबार पालिकेने देशात टॉप-१० मध्ये येण्याचा संकल्प केला होता. परंतु एका मुद्यात अवघ्या एका गुणाची कमतरता राहिली आणि ही संधी गेली. यापुढे सर्व त्रूटी दूर करून पुन्हा नव्या दमाने आणि नियोजनाने तसेच जनतेचे सहकार्य, सत्ताधारी, विरोधकांच्या सहयोगाने या उपक्रमात उतरून देशात नंदुरबारला स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप-१० मध्ये आणणारच असा संकल्प नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.
स्वच्छतेसाठी आणि या उपक्रमासाठी काय नियोजन केले?
नंदुरबार पालिकेने सलग तिसऱ्यांदा या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी नियोजनबद्ध प्द्धतीने काम केले. कुठेही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. कचरा संकलन, त्याची विल्हेवाट, हगणदारीमुक्त शहर, महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, सॅनिटरी नॅपकीन मशीन लावणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याला प्राधान्य दिले गेले. सर्व घटकांनी या कामात आपल्या परीने योगदान दिले त्यामुळे हे शक्य झाले.
टॉपटेनचा संकल्प असतांना ४१ व्या क्रमांकावर समाधान का मानावे लागले?
देशात नंदुरबार टॉप टेन मध्ये यावे यासाठीच काम करण्यात आले. केद्राची कमिटीनेही पालिकेने केलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. सर्व घटक आणि मुद्यात चांगले गुण मिळाले. परंतु एका मुद्यातील एक गुण कमी मिळाला आणि आपला नंबर हुकला. तरीही देशात पहिल्या ५० शहरात येणे ही बाबही कमी नाही.
जनतेला काय आवाहन करणार?
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनतेने नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढी काळात देखील जनतेच्या बळावरच आपल्याला काम करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता राखावी, कचरा गाडीतच कचरा टाकावा, सार्वजनिक जागांची निगा राखावी, नियमांचे पालन करावे हीच अपेक्षा आहे.

शासनाच्या नियमानुसार आता कचरा डेपोसाठी नवीन जागा मिळणार नाही. त्यामुळे पालिकेने दुधाळे शिवाारातील कचरा डेपोतील कचºयाची ९० टक्के विल्हेवाट लावली. ओला, सुका कचरा वेगळा ठेवणे, बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावली जात आहे. ही बाब केद्रीय समितीनेही अधोरेखीत केली होती.

पालिकेच्या घंटा गाड्या दररोज घरोघरी कचरा संकलन करतात. नागरिकांना पालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबीनही पुरविण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा दररोज सकाळी उचलला जातो. सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेथे स्वच्छता असते ते लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते, त्यानुसार शहवासीयांनी स्वच्छतेचा घेतलेला वसा असाच कायम ठेवावा अशी अपेक्षाही रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केली.