शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या मोहिदा येथे शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन ...

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन केले. सोमवारी रात्री अचानक घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी गावात दोन्ही समाजाच्या लोकांच्या सहकार्याने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली होती. या शांतता कमिटीला सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम शंभू पाटील, माजी सरपंच गिरीधर लिंमजी पाटील, माजी सरपंच जाधव संभू पाटील, राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परबत भिल, सुकराम भिलसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत म्हणाले, गावातील प्रत्येक नागरिकांना एकमेकांशी संबंध ठेवायचे असतात. रोज येणे-जाणे-भेटणे क्रमप्राप्त आहे. आपसातील मतभेद विसरून गावात शांतता ठेवा व शेतीकामे सुरू करून एकमेकांना सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. याव्यतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांनी गावातील दोन्ही समाजातील व्यक्तींना शांततेचे आवाहन करीत, गाव शांततेकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. रोजच्या शेती, व्यवसायासोबत दिनचर्या आनंदाने सुरू ठेवा. गावात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले. कोणीही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनीदेखील मार्गदर्शन करताना म्हटले की, मामाच्या मोहिदा हे गाव तालुक्यात सामाजिक सांस्कृतिक सलोख्याचे व शांतताप्रिय गाव आहे. या गावात सर्व समाज एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने वावरत असतात. घडलेल्या घटनेला कोणी तरी खत-पाणी घातले असेल. असे असले तरी गावातील समस्या या गावातील नागरिकांनी बसूनच सोडवल्या पाहिजेत. कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. गावातील तंटे गावातच शांततेने सोडवण्यात येणार असल्याचेदेखील सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनी सांगितले.

गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच समाजातील घटकांकडून गावात प्रयत्न केला जाणार आहे. कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केले आहे.

दोन समाज एकमेकांना सहकार्य करून गावात शांतता ठेवत असतात. कालच्या झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी दाखवलेली सहनशीलता व गावात शांतता प्रस्थापित केल्याने ग्रामस्थांचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

शहादा पोलिसात अंबालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.