शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली ‘पाण्या’चा बाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:57 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली शहरासह तालुक्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय जोरात ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली शहरासह तालुक्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना केंद्रीय जल आयोग तसेच अन्न व प्रशासन विभागाची मान्यता नाही, तर अनेक प्रकल्पांत नियमानुसार आवश्यक असलेले फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळाच अस्तित्वात नाहीत. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.सध्या पाण्याची पातळी खालावल्याने अशुद्ध पाणी मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांसह घरोघरी आरओ पाण्याचे जार विक्री करणाऱ्यांकडून पाणी मागविले जात आहे. यासाठी पाणी विक्रीच्या व्यवसायात तालुक्यात किमान ७० पेक्षा अधिक उद्योजक कार्यरत आहेत. यापैकी अनेक उद्योजकांकडे परवानाच नाही. आरओ पाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय जल आयोग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र मोठ्या प्रमाणात शहरासह तालुक्यात विनापरवाना हा उद्योग सुरू आहे. या सर्व प्रकारापासून अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास येते तर उद्योजक व या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे हा उद्योग बिनभोबाटपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पाण्याची शुद्धता शास्रीय पद्धतीने तपासण्याची यंत्रणाच कुठल्याही प्रकल्पात नाही. या उद्योजकांनी अक्षरशः शासनासह नागरिकांची दिशाभूल करून     शुद्धतेच्या नावाखाली अशुद्ध पाणीपुरवठा करीत त्यांच्या        आरोग्याशी खेळण्याचा उद्योग सुरू केला आहे.शहर व तालुक्यात पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत वापरात नाही. परिणामी बोअरवेलद्वारे पाणी मिळवून त्यावर प्रक्रिया केली जाते. शहादा तालुक्यातील बोअरवेलमधील पाण्यात सर्वाधिक क्षार असल्याने शहर व तालुक्यात किडनीस्टोनच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बोअरवेलमधील पाण्यातून क्षार, विषाणू, क्लोराईड व अन्य घातक द्रव्य काढणे आवश्यक आहे. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य होते, मात्र आवश्यक असलेली शास्रीय प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने थंड पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. २० लिटरच्या थंड पाण्याच्या जारसाठी २० रुपये आकारले जातात, तर घरोघरी मोबाइल व्हॅनद्वारे पाच रुपयांत १० लिटर व १० रुपयांत २० लिटर पाणी विक्री केले जाते. नगरपालिकेनेही एका खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाॅटर एटीएमद्वारे अशाप्रकारे सवलतीच्या दरात पाणी उपलब्ध करून दिले आहे.दिवसभरात शहर व तालुक्यात या व्यवसायातून लाखो लिटर पाण्याची विक्री केली जाते; परंतु पाणी शुद्ध करण्याबाबत आवश्यक असलेली स्वच्छता शास्रीय प्रक्रिया व पॅकिंगसंदर्भातील निकषाची योग्य ती अंमलबजावणी केली जात नसल्याने केवळ थंड पाण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील सर्व पाणी उद्योग व उद्योजकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

नियमानुसार पाण्याच्या शुध्दतेसाठी १४ शास्रीय प्रक्रिया व पाणी पिण्यायोग्य होण्याची किमान ३२ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने मान्यता दिलेले यांत्रिक उपकरण, औषधी वापरणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी डिस्टिल करणे, त्यातील ऑक्सिजनची पातळी, हार्डनेस, पीएच, ओजोन, कलर, जिवाणूंची स्थिती, जडपणा व पाण्यातील टीडीएस कमी करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पात प्रयोगशाळा असणे बंधनकारक आहे. येथे एक निष्णांत मायक्रोबाॅयलाॅजिस्ट व फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. मात्र या पाणी उद्योग केंद्रात प्रयोगशाळाच अस्तित्वात नाही. परिणामी येथे निर्माण करण्यात आलेले पाणी पिण्यास योग्य की अयोग्य, असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. कुठलीही तपासणी होत नसताना केवळ क्लोरिन वायूचा सर्वाधिक वापर करून पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व परवानगी नसणाऱ्या वॉटर प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित उद्योजकांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. नियमबाह्य सुरू असलेले प्लांट सील करण्याची कारवाई पालिका प्रशासनातर्फे लवकरच करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आरओ पाणी विकणाऱ्या उद्योजकांवर कारवाई केली जाईल. शहरातील ११ आरओ वॉटर प्लांट चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.-राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका, शहादा