शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बाजार पेठेची वेळ सात ते पाच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार शिरिष नाईक यांच्या उपस्थितीत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत घेण्यात आला.शहरातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल ३ जुलैला पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाकडून दोन दिवस शहर बंद ठेवण्यात आले. दरम्यान सोमवार पासून बाजारपेठेची वेळ दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आली होती. सोमवारपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. दडी मारलेला पाऊस गेल्या तीन दिवसापासून सुरू झाल्याने शेतीपयोगी साहित्य घेण्यासाठी शेतकरी शहरात येताहेत. सलग दोन दिवस बाजार बंद केल्याने सोमवारी बाजारात एकच गर्दी झाली. या वेळी कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची स्थिती होती.कोरोना बाधित वृध्दा गेल्या दहा दिवसापासून नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. बाजारपेठेची वेळ कमी केल्याने शहरात गर्दी होणारच या मताशी व्यापारी व नागरीक सहमत असल्याची भावना आमदार शिरीष नाईक यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभुमीवर त्यांनी पालिकेच्या बहुउद्देशिय सभागृहात बैठक घेतली. बैठकीत तहसीलदार सुनीता जºहाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, मुख्याधिकरी राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिकेचे गटनेता आशिष मावची, विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी तथा नगरसेवक उपस्थित होते.कोरोना संसर्गाचा सारासार विचार करून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय आमदार नाईक यांनी घेतला. त्यांच्या सुचनांवर अंमल करण्यासाठी प्रशासन आपल्या आधीच्या निर्णयात बदल करून बाजारपेठेची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी करीत असल्याचे तहसलीदार सुनीता जºहाड यांनी सांगितले.बैठकीत पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात स्वयंसेवक नेमण्यात येत असून, त्यांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती दिली. कोरोनापासून कसा बचाव करावा याबाबत स्वयंसेवक प्रभागनिहाय जनजागृती करतील असे ते म्हणाले.दरम्यान, मंगलदास पार्क मधील कोरोना बाधित वृद्धेच्या संपर्कातील सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोमवारी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरातील जनता पार्क परिसरातील ५५ वर्षीय पुरूष नंदुरबार येथे उपचार घेत असून, त्यांनाही कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची व त्यांच्या संपर्कातील परिवाराच्या सदस्यांना होम क्वॉरंटाईन केले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे तसेच आवश्यक काम असल्याशिवार घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार शिरीष नाईक यांनी केले.